या भेटीदरम्यान कूक यांच्यासोबत अॅपल इंडियाचे प्रमुखही उपस्थित होते. यावेळी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीशीही कूक यांची बातचीत झाली. आज दिवसभरात टिम कूक टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री यांची भेट घेणार आहेत.
कूक यांच्या पुढच्या दौऱ्याबद्दल अजून स्पष्टता नसली तरीही मुंबईनंतर कूक -हैद्राबाद, बंगळुरु, आणि दिल्लीलाही भेट देणार असल्याची शक्यता आहे. नवी दिल्लीतील भेटीदरम्यान टीम कूक पंतप्रधान मोदींचीही भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.