Sanjay Raut Criticises RSS and Mohan Bhagwat Over Celebrity Presence: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली. याचेच औचित्य साधत संघाकडून शनिवारी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवे क्षितिज या विषयावर सरसंघचाक मोहन भागवत यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खास सेलिब्रिटींना आमंत्रण देण्यात आले होते. सेलिब्रिटींमध्ये अभिनेता सलमान खानची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठली.  अदनान सामी आणि शिल्पा शेट्टीने देखील सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.  दरम्यान, याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आगपाखड आणि मोहन भागवत यांच्यावर टीका केली.

Continues below advertisement

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, "कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. काही लोकांना पाहून आम्हाला धक्का बसला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र भक्ती किती ढोंग आणि पाखंड आहे, हे यातून दिसून येतं. आम्ही पाहिलं गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत न्याहारी करत होता. सरसंघचालकांना याबद्दल माहित नसावं, किंवा ज्यांनी या कार्यक्रमासाठी दिग्गजांना आमंत्रणं दिलं त्यांना माहित नसावं की, सरसंघचालकांच्या बाजूला बसलेले व्यक्ती हे देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झालेले आहेत. अदनान  सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या एअरफोर्समध्ये होते. 1965 च्या भारत पाक युद्धामध्ये अर्शद खानने भारतावर बॉम्बिंग केलं होतं. पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता. तो अदनान सामी सरसंघचालाकांच्या बाजूला बसलेला होता. तुम्ही कोणत्या इतिहासाचे धडे देताय? कोणती प्रेरणा देताय?",  असं राऊत म्हणाले. 

"एक नटी होती बाजूला, ती म्हणाली आय लव्ह भागवत. मला भागवत फार आवडतात. तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे.  तिच्या नवऱ्यावर अडल्ड फिल्म तयार करण्याचा गुन्हा होता.  ही काय प्रेरणा आहे? असे असंख्य लोक तिथे उपस्थित होते.  कदाचित सरसंघचालकांना याबाबत माहित नसेल, की संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं आहे. भारतावर हल्ला करणारे पाकिस्तानी, लुकआउट नोटिस असणारे कलाकार, बँके बुडवणारे लोकांना तु्म्ही बोलवताय.., संघ पापांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे.  आम्हाला संघाविषयी आदर आहे", असंही राऊत म्हणाले.

Continues below advertisement

"जावेद अख्तर यांना आमंत्रण दिल्याचं मला दिसत नाही. ते थोर सामाजिक विचारवंत आहे.  जावेद अख्तर यांचे काका  हे अंदमानमध्ये सावरकरांसोबत काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते.  हे बहुतेक त्यांना  माहित नसेल. शाहरूख खानला बोलवलं नाही. शाहरूख खानचे आजोबा हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यातील सेनापती होते. त्यांच्या दृष्टीनं हे सगळे राष्ट्रद्रोही असावेत. अदनाम सामी आणि इतर कलाकार हे त्यांच्या दृष्टीनं राष्ट्रभक्त आहेत", असं म्हणत संजय राऊत यांनी संघावर टीकेचे बाण सोडले.