Ratnagiri News : शिवसेनेत (Shiv Sena) झालेल्या बंडाळीनंतर मागील महिनाभरापासून शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांच्यात एकप्रकारे चढाओढ लागली आहे. सध्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा, प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, मोर्चा काढणं, जोरदार शक्तीप्रदर्शन करणे आदि गोष्टी सध्या सुरु आहेत. यामध्ये कोकण देखील कुठेच मागे नाही. कारण, योगेश कदम (Yogesh Kadam), उदय सामंत (Uday Samant) आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्यासोबत कार्यकर्ते आणि काही नेते देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा देताना दिसून येत आहे. चिपळूणमध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या वर्षभरापूर्वी तालुक्यातील महापुरात केलेल्या मदतीसाठी आभार प्रदर्शनाकरता लावलेला होर्डिंगवरुन राजकीय वातावरण देखील तंग झालेलं दिसून आलं. या साऱ्यामध्ये रत्नागिरी शहारातील घडामोडींकडे डोळेझाक करुन चालणार नाही. कारण, शिवसेनेने विनायक राऊत यांच्या नेतृत्वात निर्धार मेळावा घेत उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल चढवला. पण, उदय सामंत रत्नागिरी येथे आले आणि त्यांच्यासोबत नेमकं कोण? याचं चित्र देखील स्पष्ट होऊ लागलं. रत्नागिरील शहरातील 20 माजी नगरसेवकांनी रत्नागिरी शहरातील माळनाका येथील शासकीय विश्रामगृहावर सामंत यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. पण, त्यानंतर चारच दिवसात शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी माजी खासदार अनंत गिते यांच्या उपस्थितीत आमच्यासोबत जवळपास 7 माजी नगरसेवक असल्याचा दावा केला. पण, त्यानंतर उदय सामंत यांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी करत नगरसेवकांचा पाठिंबा नेमका कुणाला? याबाबतचं चित्र स्पष्ट केलं.
सामंतांनी दाखवला आंखो देखा हाल!
2 तासात दोन नगरसेवक साळवींच्या भेटीला!