Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीत अनेक मतदारसंघात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) देखील असाच काही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते आणि रायगडमधील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना (Sunil Tatkare) विरोध केला जात होता. सोबतच भाजपचे देखील काही पदाधिकारी नाराज होते. त्यामुळे तटकरेंच्या अडचणीत वाढ होतांना पाहायला मिळत होते. मात्र, आता हा वाद मिटला असून, तटकरे यांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंदेसेनेचे आमदार भरत गोगावले (Bharatshet Gogawale) म्हणाले आहेत. 


रायगड लोकसभेतील महायुतीचे उमेदवारी सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर भाजपसह इतर कार्यकर्ते रायगडमधून नाराज होते. मात्र, ही नाराजगी आता संपली असल्याची पाहायला मिळत आहे. कारण एका कार्यक्रमात आमदार भरत गोगावले यांनी याबाबत भाष्य करत, 'आम्ही सुनील तटकरे यांना युतीचा धर्म पाळून मदत करणारं आहोत. आम्हाला ते विधानसभेला मदत करतील असे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं गोगावले म्हणाले आहेत. 


नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? 


मागील काही दिवसांपासून जी काही चर्चा सुरु होती, त्याला आज पूर्णविराम मिळालेला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि आमची बैठक झाली आहे. त्यामुळे आता व्यवस्थितपणे मनोमीलन झाले आहे. मी देखील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार आजची आमची एकत्रित बैठक पार पडली आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांना मोठ्या फरकाने आणि टॉप टेनमध्ये निवडणून आणणार आहोत. तसेच आम्ही जेवढ्या ताकदीने लोकसभा निवडणूकीत काम करणार आहोत, त्यापेक्षा दुपटीने विधानसभा निवडणुकीत ते आमचे काम करतील असे तटकरे यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे गोगावले म्हणाले. 


भाजप नेत्यांची ही समजूत निघाली...


शिंदेसेना प्रमाणेच भाजपमधील स्थानिक कार्यकर्ते देखील तटकरे यांच्या उमेदवारीला विरोध करत होते. तटकरे यांना उमेदवारी देऊ नका असा सुरु भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे शिंदेसेना आणि भाजपमधील स्थानिक नेत्यांची, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी एक एकत्रित बैठक आयोजित केली होती. यावेळी स्थानिक महत्वाच्या नेत्यांना देखील बोलवण्यात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत मागील सर्वकाही विसरून महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता तटकरे यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Sunil Tatkare : 'सुनील तटकरेंचा राजकीय कडेलोट करणार'; शिंदेसेनेचे नेते आक्रमक, आता रायगडात नाराजीनाट्य