खंडाळा घाटातल्या अमृतांजन पुलावरुन खाली पडून 20 वर्षीय विद्यार्थी मृत्युमुखी पडला. तनवेल कदम असं या त्याचं नाव असून तो मूळ मालेगावचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिस अधिक तपास करत असून त्यानंतरच या अपघाताचं कारण समजू शकेल.