Gopichand Padalkar :  भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यामध्ये अंतर आलं पाहिजे, असं शरद पवारांनी (sharad pawar) म्हटलं होतं. त्यांना शिवसेनेला पूर्णपणे संपवायचं होतं, ते त्यांनी केलं, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी केली आहे. ते बारामतीत बोलत होते. एक राजा होता आणि त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं, असं मी ऐकलं होतं. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते हे आता मी प्रत्यक्षात बघितलं. राष्ट्रवादीच्या नादाला जो जो लागेल त्याची राख होत आहे. आता शिवसेनेचं काय झालं ते आपल्या समोर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह दिलं पाहिजे होतं. यांना मशाल आता रुजवायला वेळ लागेल. खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात आलं असतं, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचा  जन्मच खंजीरातून झालेला आहे आणि आता नवा एक खंजीर घुसवणारा निर्माण पवारांनी केलेला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून सेना आणि राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्या, असं  मी निवडणूक आयोगाला पत्र लिहीन मात्र फक्त ते खंजीर एकमेकांत घुसवू नका, असा सल्लादेखील त्यांनी दिला. 


'सातवा वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे'


एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतो ते एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पहिजे आणि हा मुद्दा आम्ही सरकारकडे लावून धरत आहोत, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यांनी एमआयडीसी आगर येथे सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य एमआयडीसी शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन केलं त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.  काही चुकीच्या नियमामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वरती अन्याय होतो. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही याासाठी काम करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट  केलं, 


राज्यामध्ये कर्मचारी आणि असंघटित कर्मचारी यांची संख्या करोडोच्या घरात आहे आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊन काही लोकांनी अनेक संघटना केल्या कर्मचाऱ्यांना न्याय न देता कर्मचाऱ्यांचा फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापर करून घेतला. त्या कर्मचाऱ्यांचे शोषण केलं. संघटना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करीत होत्या, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर ही संघटना उभी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. 


 'शिवसेना सत्तेत असताना एकाला पण विमा मिळाला नाही'
अर्थमंत्र्यांनी घोषणा केली होती की ज्या कर्मचाऱ्यांनी नियमित कर्ज भरलेला आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन पर 50,000 देऊ मात्र त्यांना ते द्यायला जमलं नाही. आमच्या सरकारने ते निर्णय करून लोकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवसेना सत्तेत असताना एकाला पण विमा मिळाला नाही, असं ते म्हणाले. 


आमचे दोन्ही नेते घरात बसणारे नाहीत: गोपीचंद पडळकर


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोलीचा दौरा केला. विरोधी पक्ष तीन महिन्यापूर्वी सरकारमध्ये होता हे विसरून गेला आहे. त्यांची तीन महिन्यापूर्वीची भाषणे काढा आणि आताचे भाषण काढा त्यामध्ये प्रचंड तफावत दिसून येईल. आम्ही विश्वासघाताने विरोधात गेलो होतो परंतु आम्ही शेतकऱ्यांची ठामपणे बाजू लावून धरत होतो. आता सरकारमध्ये आलो आहोत तर आमचे दोन्ही नेते घरात बसणारे नाहीत हे फिल्डवरती जाणारे आहेत, मदत करणारे आहेत आणि शेतकऱ्यांना माझं आपल्या माध्यमातून आवाहन आहे की तुमच्या बाजूने सरकार आहे. तुम्हाला जिथे जिथे अडचण येतील तिथे तिथे सरकारकडून मदत होईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.


मराठा समाजाच्या बाजूने सरकार ठामपणे उभा
चंद्रकांत दादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले हे कोणी विसरता कामा नये. आठ- दहा तास त्या विषयावरती काम करताना मागच्या सरकारमध्ये आम्ही स्वतः त्यांना बघितले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मराठा समाजाचा आरक्षण गेलं. आता तुम्ही परत सरकार आल्यानंतर काहीतरी तोडफोड करायचा प्रयत्न करत आहात मात्र मराठा समाजाच्या बाजूने सरकार ठामपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी मराठा समाजाला दिला. 


ही बातमी देखील वाचा