पुणे : पुण्यात सोसायटीची भिंत कोसळून झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. इमारतीच्या कपाऊंडची भिंत बांधतांना बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.

Continues below advertisement





या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जाहीर केली आहे. एनडीआरएफच्या (नैसर्गिक आणि आपत्ती व्यवस्थापन) कोट्यातून ही मदत दिली जाणार आहे. मात्र या दुर्घटनेतील मृतांपैकी अनेकजण एकाच कुटुंबातील आहेत, मग ही मदत देणार कुणाला हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.


पुण्यातील कोंढवा भागात आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


पाहा काय म्हणाले जिल्हाधिकारी




संबंधित बातम्या