पुणे : घरी जाण्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ परप्रांतीय मजुरांनी गर्दी केली होती. अचानक मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पंगावले. त्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. काही वेळानंतर या सर्व परप्रांतीय नागरिकांना एका मोकळ्या शेडमध्ये घेऊन जात या सर्व नागरिकांची नावे नोंदवून घेण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलीस अधिकारी अशोक कदम यांनी दिली आहे. केंद्र सरकारने सर्व मजुरांना आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने आता सर्वजण घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


आजपासून देशभरातील दुसरा लॉकडाऊन संपला असून तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. अशा नागरिकांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे नावनोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ उत्तरप्रदेशच्या नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु, अचानक मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला पंगावले. त्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर या सर्व परप्रांतीय नागरिकांना एका मोकळ्या शेडमध्ये घेऊन जात या सर्व नागरिकांची नावे नोंदवून घेण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलीस अधिकारी अशोक कदम यांनी दिली.


प्ररप्रांतीय मजुरांना घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारची तयारी
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी राज्य सरकारने आता पुढाकार घेतला आहे. प्रवास करण्यासाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र आता महापालिकेतर्फे देण्यात येणार आहे. तसेच खासगी वाहन अथवा टॅक्सीने प्रवास करण्यासही मुभा देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्य सरकार, रेल्वे प्रशासन आणि महापालिका आयुक्तांची बैठक झाली. जे मजूर जाणार त्यांना महापालिका स्थानिक शाळेत कॅम्प लावणार आहे. त्या ठिकाणी अशा मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी या मजुरांना कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागणार नाही.


प्रवास करतानाच्या अटी




  • एका रेल्वे गाडीत फक्त 1200 प्रवासी जाणार

  • रेल्वे डब्यातून प्रवास करणाऱ्यांना मास्क, पाणी आणि जेवण देण्यात येणार.

  • इतकंच नाहीतर ज्यांना खासगी गाडी, टॅक्सी मधून जाण्याची इच्छा आहे त्यांना पण परवानगी देण्यात येणार आहे.

  • सर्व मजुरांची कोरोना चाचणी करून पाठवण्याची अट उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्याने घातली होती. त्यावर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्या सरकारशी चर्चा सुरू आहे.

  • जवळच्या रेल्वे स्थानकावरून ट्रेन सोडणार.


Lockdown 3 | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट