'एकाच हट्टापायी लोकांना वेठीस धरणं चुकीचं आहे. निर्णयाला विरोध केल्यास तुम्ही देशविरोधी आणि पाठिंबा दिल्यास देशासोबत हे अतिशय चुकीचं आहे.' अशी थेट टीका अजित पवारांनी मोदींवर केली.
'नोटाबंदीनंतर नगरपरिषदेच्या निवडणुकात मिळालेलं यश म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ होता. नगरपालिका निवडणुकीच्या निर्णयानंतर जातीयवादी पक्षाचा पराभव करण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय झाला आहे.' असंही अजित पवार यावेळी म्हणाले.