Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधानपरिषदची निवडणूक (Vidhan Parishad Election) 12 जुलैला पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून आमदारांच्या बैठका घेणे. तसेच आमदारांना होटेलमध्ये ठेवणं सुरू केल्याचं पाहिला मिळतं आहे. कोणत्या पक्षाने काय खबरदारी घेतलीय पाहूयात..


विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता 


विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार सध्या रिंगणात आहेत  त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. ही फाटाफूट रोखण्यासाठी आता सर्वच पक्षांनी खबरदारी घेतल्याचं पाहिला मिळत आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जो तो आपली व्यवस्था करत असतो. विधान परिषद निवडणूक आहे. 


विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी एक मुंबईत बैठक घेतली आणि त्यात विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी सुचना दिल्या. तसेच आगामी निवडणुकीत मतांची गोळाबेरीज देखील केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती आहे. 


महायुतीकडे एकूण 200 आमदार तर महाविकास आघाडीकडे 65  


सध्या महायुतीकडे एकूण 200 आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वबळावर आपले उमेदवार निवडूण आणायचे असतील तर अजुन 4 मतांची गरज आहे तर ठाकरे गटाला आपला उमेदवार निवडून आणायचा असल्यास 8 मतांची गरज आहे.


भाजपला आपले 4 उमेदवार स्वबळावर निवडून आणता येऊ शकतात. माञ पाचवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यांना देखील स्वतःची 8 मते असणं गरजेचं आहे. सूत्रांचा माहितीनुसार प्रत्येक पक्षाला आपली मतं स्वतः गोळा करावी लागणार आहेत.


काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता जास्त आहे


सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता जास्त आहे. माञ अद्याप काँग्रेसकडून हॉटेल बुक करण्यात आलेले नाही. माञ सर्व आमदारांना एकत्रित मतदान  कसं करावं अशी सूचना करण्यात आली आहे. काँग्रेसकडे एकूण 37 मते असून 23 मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर 14 मते शिल्लक आहेत. ही मते जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांना मिळूं शकतात. मात्र कमी पडणारी मतं ही प्रत्त्येक पक्षाला गोळा करावी लागणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


Tejas Thackeray : 'हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून तमाम मराठी माणसाच्या काळजात "धकधक" झालं', तेजस ठाकरेंच्या डान्सवर आशिष शेलारांची टीका