Uddhav Thackeray : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) म्हणतात कर्ज माफी अपेक्षित आहेत. असेआहेतर मग ती कधी करणार? जूनमध्ये करणार तर मग आतां कर्ज फेडायचं की नाही? एका शेतककरीबांधवाने तहसीलदाची गाडी फोडली. त्याला काय काम नव्हतं का? मी तर सांगतो, जरतुम्हाला मदत मिळाली नाही तर तहसीलदारला घेराव घाला आणि त्याला सांगा आतां मुख्यमंत्र्यांना फोन लावा, मग तुम्हला सोडतो, असंसांगा. असासल्ला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकऱ्यांनादिलाआहे. यावेळीबोलतानात्यांनी सरकारवर सडकून टीकाही केली आहे.

परभणीमध्ये (Parbhani) शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्यातील (Marathwada) पूरस्थिती, शेतकरी आणि रखडलेली कर्जमुक्ती यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'भाजपवाले काय सांगतात? कोणतंही बटण दाबा मत आम्हालाच मिळेल', असा गंभीर आरोप करत त्यांनी (EVM) आणि बोगस मतदारांद्वारे सरकार मतचोरी करत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरण्याऐवजी बिहारमध्ये (Bihar) प्रचारात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. अजित पवारांच्या (Ajit Pawar) 'शेतकऱ्यांना फुकटची सवय' या वक्तव्याचा समाचार घेताना, मराठवाड्यात शंभर वर्षांत आली नाही अशी आपत्ती आल्याचे ठाकरे म्हणाले. सरकारने पंचनामे करून तातडीने कर्जमुक्ती द्यावी, अन्यथा गावकरी तहसीलदाराला घेराव घालतील असा इशारा त्यांनी दिला.

Uddhav Thackeray : शिवी देऊ नका, गाडी फोडू नका; शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यलयात जाऊन बसा

शेतकऱ्याने गाडी फोडली, हा त्यांचा नाईलाज होता. शेतकऱ्याचेमी कौतुक करतो.जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडणार नाही आणि दाबणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. तुम्ही शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यलयात जाऊन बसा, त्याला शिवी देऊ नका किंवा गाडी फोडू नका. त्याला डब्बा घेऊन जा. सडका गहू तांदूळ आणित्यामधील किडे असलेले अन्न शिजवा आणि तहसीलदारला द्या. त्याला सांगा बाबा तू आमची मदत दे तर आम्ही सोडतो, नाहीतर मुख्यमंत्री यांना सांगा मग सोडतो. असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

Uddhav Thackeray on PM Modi : नरेंद्र मोदी आता पॅकेज जाहीर करतील आणि पुन्हा तुमच्या तोंडाला पानं पुसतील

केंद्रीय पथक तुमच्या गावात आलं का? परदेशी समिती येणारहोती आली का? 18 जुलैला समिती स्थापन झाली. जुलैपासून आतापर्यंत परदेशी झोपले होतेका? आता मी सांगतो केंद्रीय पथक आकारणता निवडणुका आहेत. तेंव्हा नरेंद्र मोदी एक पॅकेज जाहीर करतील आणि तुमच्या तोंडाला पानं पुसतील. अशीटीकाहिउद्धवठाकरेयांनीकेली. मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात. आता मी विकासावर बोलतो, पण तुम्ही- मी ज्या गावात सध्या आहे, त्या गावात या मी थांबतो. हेलिकॉप्टरने या आणि मुख्य रस्त्यापासून आतमध्ये गावात गाडीने या किती हाड मोडतात ते सांगा. शक्तीपीठ मार्ग कोणाला हवाय? शक्तीपीठ झाला कि शेतकरी भिकेला लागेल. असेहीउद्धवठाकरेम्हणाले.