Suresh Dhas: संतोष देशमुख यांना झालेल्या भयंकर आणि हादरवून टाकणाऱ्या हाणामारीचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. गुन्हे व अन्वेषण विभागाने (CID) सादर केलेल्या दोषारोपपत्रानंतर हे धक्कादायक पुरावे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले होते. त्यानंतर तातडीने हलचाली करून धनंजय मुंडेंना बोलवून राजिनामा देण्यासाठी सांगितल्याचं सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सांगितलं. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजिनाम्यानंतर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदच द्यायला नको होते, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली होती. त्यानंतर सुरेश धसांनी माझा कट्ट्यावर पंकजा मुंडेनी ही प्रतिक्रीया द्यायला जरा उशीरच केल्याचं सांगत आता हत्ती गेला, शेपूट राहिलं असताना बोलून काय उपयोग असा सवालही त्यांनी केला. वाल्मिक कराडच्या इव्हेंट मॅनेजमेंटने पंकजा मुंडे हुरळून गेल्याची टीकाही त्यांनी केली. (Pankaja Munde)
काय म्हणाले सुरेश धस?
'धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, की धनंजय मुंडेंना मंत्रीपदच द्यायला नको होतं. त्यांच्या राजीनामा खूप आधी घ्यायला हवा होता. पंकजाताईंना हे बोलायला फार उशीर झाला. हत्ती गेला अन् शेपटासाठी बोलल्यात. शेपटाच्या वेळी बोलून काय उपयोग. पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया फार आधी यायला हवी होती. संतोष देशमुखच्या घरी आधी त्यांनी जायला पाहिजे होतं. संतोष देशमुख कोण आहे? त्यांच्याच पक्षाचा बुथप्रमुख. मस्साजोग हे गाव मराठा बहुल गावात एजंट होणंसुद्धा पाप होईल एवढी गंभीर परिस्थिती होती. पंकजा मुंडेंचा संतोष देशमुखांनी सत्कारही केला होता. बुथप्रमुख जर मतदानाच्या वेळी नसेल तर धपाधप बोगस मतदान होईल. त्या बुथवर थांबला ना संतोष...' पंकजाताईंविषयीची नाराजी ही आहे की त्यांनी तिथे जाऊन भेटायला हवं होतं. पण त्या गेल्या नाहीत. सगळं झाल्यानंतर आता तुम्ही म्हणतायत की धनंजय मुंडेंना मंत्रीपदच द्यायला नको होतं. तेंव्हाच का नाही म्हणालात? असा सवाल सुरशे धसांनी केला.
'त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटला पंकजाताईही हुरळूनच गेल्या'
घटना 9 तारखेला घडली होती. 14 तारखेला मंत्रीमंडळाचा विस्तार होता. त्यामुळं मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचं हा तेंव्हा प्रश्नच नव्हता. भाजपचा त्याच्याशी संबंध नाही. त्यात अजित दादा, प्रफूल पटेल, सुनिल तटकरे, यांचा विषय होता. त्यामुळे या दोन तीन नेत्यांनी तो विचार करायला पाहिजे होता. 13 तारखेला तिथे जाऊन म्हणायला हवं होतं मला द्या नाहीतर नका देऊ पद. पण धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका. का देऊ नका कारण वाल्मिक अण्णा धनंजय मुंडेंच्या जवळचा होता. वाल्मिक इव्हेंट मॅनेजमेंटवाला होता. पंकजा ताईंचाही सत्कार त्यानं केला होता.त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटला पंकजाताईही हुरळूनच गेल्या. वाल्मिकनं उधळलेल्या पाकळ्या तुम्हीही घेतल्याच होत्या. असेही सुरेश धस म्हणाले.
हेही वाचा: