Sonam Wangchuk on india: पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देशाच्या भवितव्यावर थेट भाष्य केलं आहे. जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली, तर भारत 2047 पर्यंत एक विकसित देश बनू शकणार नाही, असे म्हटले आहे. वांगचुक म्हणाले की, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या देशांनी भारताला आधीच मागे टाकले आहे. योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला एका शांततापूर्ण क्रांतीची गरज आहे. त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. या काळात त्यांनी देश आणि त्याच्या भविष्याबद्दल खूप विचार केला.
वांगचुक यांचा व्हिडिओमध्ये पाच मुद्यांना हात
- 50 वर्षांपूर्वी भारताच्या मागे किंवा बरोबरीत असलेले अनेक शेजारी देश आता लक्षणीयरीत्या पुढे गेले आहेत. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि बांगलादेश ही याची उदाहरणे आहेत. जर भारताला 2047 पर्यंत जगात एक सन्माननीय देश म्हणून टिकून राहायचे असेल, तर मोठे बदल आवश्यक आहेत.
- देशातील प्रशासकीय आणि व्यवस्थेतील समस्या एका राजकीय पक्षापुरत्या मर्यादित ठेवता येणार नाहीत. वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांच्या काळातही विरोधाचे आवाज दाबले गेले आहेत.
- 2012-13 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर राजकीय बदल झाला. सरकार बदलूनही भ्रष्टाचार आणि अन्याय संपलेले नाहीत. आता या समस्यांनी नवीन रूप धारण केले असून त्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाल्या आहेत.
- देशाला पुढे नेण्यासाठी राजकीय नेतृत्व निवडण्याच्या पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. भारताला एका शांततापूर्ण क्रांतीची गरज आहे, जेणेकरून देशाला योग्य नेतृत्व मिळू शकेल.
- आम्ही अशा लोकांच्या शोधात आहोत जे निःस्वार्थी, निर्भय, सद्गुणी आणि सक्षम आहेत. देशात असे लोक कुठे आहेत हे मला माहीत नाही. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या प्रदेशातून आणि देशातून अशा किमान एका व्यक्तीचे नाव सुचवावे. ही नावे माझी स्वातंत्र्यदिनाची भेट असतील. मला अशा लोकांना भेटायचे आहे जे देशाचा नवा नकाशा घडवण्यात मदत करू शकतील.
- शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही, त्यांना नव्या मंत्र्यांकडून कोणतेही मोठे बदल दिसत नाहीत. देशाची प्रगती थेट त्याच्या शिक्षण व्यवस्थेशी जोडलेली आहे. जोपर्यंत शिक्षण मागे राहील, तोपर्यंत देशाचे भविष्यही मागे राहील.
वांगचुक यांचे जंतरमंतरवर उपोषण
सोनम वांगचुक यांनी 28 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले. नीट-यूजी पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी हे उपोषण सुरू केले. 18 जुलै रोजी, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना जंतर मंतरवरून फरफटत सफदरजंग रुग्णालयात नेले. नंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर वांगचुक यांनी 24 जुलै रोजी आपले उपोषण संपवले.
इतर महत्वाच्या बातम्या
