PM Modi WFH Model: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर विचारपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीत ऊर्जेची बचत करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात अवलंबलेल्या 'वर्क फ्रॉम होम' मॉडेलचाही (PM Modi WFH Model) उल्लेख केला आणि सांगितले की, जिथे शक्य असेल तिथे कंपन्या आणि संस्थांनी पुन्हा घरून काम करण्याच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे.(PM Modi WFH Model) पंतप्रधानांनी असं म्हटलंय की, आता इंधन वाचवणे हा केवळ पर्यावरणाशी संबंधित विषय राहिला नसून, तो देशाच्या आर्थिक मजबुतीशीही जोडला गेला आहे. वाढत्या जागतिक ऊर्जा किमती आणि तेल संकट पाहता, देशातील इंधनाचा वापर कमी व्हावा जेणेकरून परकीय चलनावर येणारा दबाव कमी करता येईल, अशी सरकारची इच्छा आहे.

Continues below advertisement

PM Modi WFH Model: कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर 'वर्क फ्रॉम होम'चा वापर

कोरोना महामारीच्या काळात भारतात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर 'वर्क फ्रॉम होम'चा वापर झाला होता. आयटी, मीडिया, बँकिंग, कन्सल्टिंग आणि इतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली होती. त्या काळात ऑफिसला जाणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली, रस्त्यांवरील वाहतूक घटली आणि पेट्रोल-डिझेलच्या वापरातही घट दिसून आली होती. प्रदूषणाची पातळीही लक्षणीयरीत्या कमी झाली होती. आता सरकार 'वर्क फ्रॉम होम' मर्यादित स्वरूपात पुन्हा एकदा स्वीकारण्याबाबत बोलत आहे. 'वर्क फ्रॉम होम' किंवा 'हायब्रिड मॉडेल'चा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे इंधनाची बचत होते. लोक दररोज ऑफिसला येण्या-जाण्यासाठी कमी पेट्रोल आणि डिझेल खर्च करतील. यामुळे ट्रॅफिक जामही कमी होतील आणि सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण कमी होईल. तसेच शहरांमधील प्रदूषणाची पातळीही कमी होऊ शकते.

PM Modi WFH Model: 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे फायदे

कर्मचाऱ्यांचा दररोज प्रवासात जाणारा वेळ वाचेल, जो ते कुटुंबासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकतील. कंपन्यांनाही ऑफिसचा खर्च, वीज आणि इतर सुविधांवरील खर्च कमी करावा लागेल. मात्र, प्रत्येक क्षेत्रात 'वर्क फ्रॉम होम' शक्य नाही. मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सपोर्ट, रिटेल, हॉस्पिटल आणि अनेक फिजिकल सर्व्हिस सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते. परंतु, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्या 'हायब्रिड' किंवा 'रिमोट' मॉडेलमध्ये सहज चालवल्या जाऊ शकतात. तज्ज्ञांचे मते, जर केंद्र सरकारने कंपन्यांना प्रोत्साहन दिले आणि राज्यांसोबत मिळून 'ग्रीन वर्क पॉलिसी'सारख्या योजना सुरू केल्या, तर भारत आपल्या तेल आयातीवरील खर्चात मोठी कपात करू शकतो. यामुळे देशावरील आर्थिक दबाव कमी होईल आणि रुपयाची स्थितीही मजबूत होऊ शकते.

Continues below advertisement

PM Modi : मोदी नेमकं काय म्हणालेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील एका सभेत देशाला उद्देशून आवाहन केले आहे. त्यांनी देशवासियांना कोरोना काळातील दिनचर्या पुन्हा अवलंबण्यावर भर देण्यास सांगितले आहे. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. या सर्व बाबी मध्यपूर्वेतील (मिडल ईस्ट) सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामांच्या संदर्भात बोलल्या गेल्या आहेत. तसेच, युक्रेन युद्धाचा उल्लेख करत या युद्धांचा भारतावर किती परिणाम झाला आहे, हेदेखील त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींनी जनतेला येत्या एक वर्षापर्यंत लग्नासाठी सोने न खरेदी करण्याचे आवाहनही केले आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, "मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी एक वर्षापर्यंत सोने खरेदी करू नये. कोरोना काळादरम्यान आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्स सारख्या व्यवस्थांचा स्वीकार केला होता. आपल्याला त्याची सवय झाली होती. आजही वेळेची हीच मागणी आहे की, आपण त्या व्यवस्थांना पुन्हा एकदा प्राधान्य दिले पाहिजे."