- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog Updates: जिथे जिथे शक्य, त्या ठिकाणी महायुती करायची; देवेंद्र फडणवीसांची भूमिका
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्विकारले जाणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 या...More
नागपूर : VIT कॉलेज ते उकळवाही हेटी दरम्यान उमरेड-नागपूर रोडवर आज दुपारी एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागल्याने मोठा अपघात टळला. बसमध्ये एकूण 45 प्रवाशी प्रवास करीत होते. सुदैवाने सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे समजते.
घटना दुपारी सुमारे २:३० वाजता घडली. VIT कॉलेजकडून उकळवाही हेटीकडे जाणाऱ्या या ट्रॅव्हल्समध्ये अचानक धूर दिसू लागला. चालकाने तातडीने बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढले. काही क्षणांतच बसने पेट घेतला. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी मदत करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र बसचा मोठा भाग जळून खाक झाला.
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, शॉर्ट सर्किटची कारणे तपासली जात आहेत. प्रवाशांमध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची अधिक माहिती मिळण्यासाठी कुही पोलिसांचा तपास सुरू आहे.
भंडारा : नगराध्यक्षपदाची शिवसेनेची उमेदवारी शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी डॉ अश्विनी भोंडेकर यांना घोषित झाली. यापूर्वी काँग्रेसच्या जयश्री बोरकर, भाजपच्या मधुरा मदनकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा साखरकर यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. त्यामुळं भंडाऱ्यातील चार नगरपरिषदेत महायुती एकत्र लढणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. तर, काँग्रेसही स्वबळावर लढत असल्यानं आघाडीतही बिघाडी झाल्याचं दिसून येतं आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार उद्या शेवटच्या दिवशी त्यांच्या समर्थकांच्या रॅलीसह उमेदवारी अर्ज सादर करून एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
नगरपंचायत आणि नगरपरिषदेची उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस राहिला आहे. असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीमधील महायुतीबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. जिथे जिथे शक्य आहे, त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे. जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही. पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत, ते आपले शत्रू नाहीयेत, विरोधकही नाही. ते आपले मित्र पक्ष आहेत हे आपण लक्षात ठेवूनच या ठिकाणी ही लढाई करायची आहे. त्यामुळे पुढच्याही काळामध्ये या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू, असे फडणवीस म्हणाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी महायुती होणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर गोंधळ
भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची; पोलीसांच्या मध्यस्थीने पुढील घटना टळली.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला मनसेच्या कृतीचा निषेध.
नाशिक : येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांना संथ गती असल्याने नरेंद्राचार्य महाराजांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. साधू-महंतांच्या जागांवर पक्के बांधकाम करू नये, यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. साधूग्रामसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, तसेच साधूग्रामची उपलब्ध जागा नाशिकमध्ये अत्यंत अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या मठाच्या जागेवर बस डेपो उभारला असल्याने आमच्यापुढे जागेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राज्य सरकारने या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली.
- वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत होणार वृक्ष संकल्पपूर्ती सोहळा...
- नाशिकच्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याला नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या दक्षिणपीठ येथे होणार वृक्ष संकल्पपूर्ती सोहळा...
- १ लाख ११ हजार ४२४ झाडे अवघ्या तीस दिवसांत लावण्यात आली
- राज्याचे वनमंत्री यांच्या उपस्थितीत कुंभनगरीत होणार साधू महंतांच्या पुढाकाराने वृक्ष संकल्प...
- वृक्ष लागवड संकल्पपूर्ती सोहळ्याला राज्यभरातून रामानंद्राचार्य नरेंद्र महाराज भक्तगण उपस्थित...
संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकर याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये मध्ये पाकिस्तान चा नंबर
झुबेर हंगरगेकर च्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये ५ आंतरराष्ट्रीय क्रमांक
हंगरगेकर याच्या जुन्या आणि वापरत्या हँडसेट मध्ये आखाती देशातील नंबर
जुन्या हँडसेट मध्ये १ नंबर पाकिस्तान, २ नंबर सौदी अरेबिया, १ नंबर ओमान आणि १ नंबर कुवेत चा
वापरत असलेल्या मोबाईल मध्ये १ ओमान आणि ४ सौदी अरेबिया चे नंबर सेव्ह
या नंबर बाबत चौकशी केली असता माहीत नसल्याचं हंगरगेकर चे उत्तर
संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर अटक करण्यात आली होती
संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकर याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये मध्ये पाकिस्तान चा नंबर
झुबेर हंगरगेकर च्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये ५ आंतरराष्ट्रीय क्रमांक
हंगरगेकर याच्या जुन्या आणि वापरत्या हँडसेट मध्ये आखाती देशातील नंबर
जुन्या हँडसेट मध्ये १ नंबर पाकिस्तान, २ नंबर सौदी अरेबिया, १ नंबर ओमान आणि १ नंबर कुवेत चा
वापरत असलेल्या मोबाईल मध्ये १ ओमान आणि ४ सौदी अरेबिया चे नंबर सेव्ह
या नंबर बाबत चौकशी केली असता माहीत नसल्याचं हंगरगेकर चे उत्तर
संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर अटक करण्यात आली होती
तुळजाभवानी मंदीर विकास आराखडा व मंदीराच्या स्वनिधीतुन होणाऱ्या मंदीर दुरूस्तीच्या कामात मंदीराचा मुळ गाभारा पाडला जावु नये अशी मागणी भोपे पुजारी मंडळाच्या वतीने केली जात होती.दरम्यान मंदीराचा गाभारा पूर्णपणे न पाडता तो मुळ स्वरुपातच ठेवण्याचा निर्णय मुंबईत पुरातत्व विभागासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिली आहे.तसेच पुरातत्व विभागाने देवीचे गर्भगृह पुर्णत न पाडता केवळ अंतराळ आणि शिखराची दुरुस्ती केली जाईल, मंदीराचा मुळ गाभारा आहे तसाच मुळ स्वरुपात ठेवला जाईल, भवानी शंकर मंडपातून अनेक स्तंभाची दूरूस्ती केली जाईल अशा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
स्कूल व्हॅनमधील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करणार्या वाहन चालकाला जुहू पोलिसांनी केली अटक
विलेपार्ले येथील एका नामंकित शाळेत या मुली शिक्षण घेत असून शाळेत ने-आण करण्यासाठी स्कूल व्हॅनने येत असतं
स्कूल व्हॅनवरील चालक आरोपी गुलजार नजीर अहमद शेख याने व्हॅनमधील मुलींना बसवण्याच्या बहाण्याने मुलींशी गैरवर्तन केले
याची माहिती मुलींनी आपल्या पालकांना दिल्यानंतर एका मुलींच्या आईच्या तक्रारीवरून जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी गुलजार नजीर अहमद शेख याला अटक केली आहे
या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत.
बीड मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन योगेश क्षीरसागर यांनी पक्षांतर्गत आपली नाराजी बोलून दाखवली. मी माझ्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. मला विनाकारण विरोध केला गेला. पक्षाचे पदाधिकारी नेमताना मला कुठेही विश्वासात घेण्यात आले नाही. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी देखील बोललो मात्र आपल्याला बाहेर टाकायचं याची जाणीव होत होती. अशी खंत योगेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवली.. तर अजित पवारांनी बीड नगर परिषदेची सूत्र पंडित कुटुंबाकडे दिल्याने योगेश क्षीरसागर यांनी पंडित यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. बाहेरचे लोक बीडमध्ये येऊन वेगवेगळ्या निवडणुकीत प्रयोग करणं कायम बीडकरांनी हाणून पाडले. हा प्रयोग सुद्धा बीडकर हाणून पाडतील आपला स्वाभिमान जागा ठेवतील असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला. दरम्यान माध्यमांशी संवाद साधल्यानंतर योगेश क्षीरसागर पत्नी सारिका क्षीरसागर यांच्या समवेत छत्रपती संभाजी नगर कडे रवाना झाले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होण्याची देखील शक्यता आहे
येरवडा येथील पेट्रोल पंपावर तीन जणाकडून कर्मचाऱ्याला मारहाण
कोयत्याने तीन जणांनी केला कर्मचाऱ्यावर हल्ला
पैशाच्या वादातून करण्यात आली मारहाण
या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यांनंतर आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांची गुडघ्यावर चालून धिंड काढून अद्दल घडवण्यात आली
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबतं
जागावाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून गृहपाठ सुरु
आज काही वाॅर्डसंदर्भातल्या चर्चेसंदर्भात मनसे नेत्यांची बैठक पार पडणार
मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वाॅर्डसंदर्भातली चाचपणी मनसेकडून सुरु
थोड्या वेळात मनसे नेत्यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक
कोळशाची वाहतूक करणारा नादुरुस्त ट्रक रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या बाजूला उभा होता. रात्रीच्या अंधारात या नादुरुस्त ट्रकवर पाठीमागून आलेल्या अन्य एका कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकनं त्याला जबर धडक दिली. या भीषण अपघातानंतर दोन्ही ट्रक राष्ट्रीय महामार्गावर आल्यानं. पहाटेपासून या महामार्गाची वाहतूक खोडंबली. ही घटना भंडारा - तुमसर या राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी तालुक्यातील दहेगाव इथं घडली. या अपघातात पाठीमागून धडक दिलेल्या ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला. मात्र, पहाटेपासून या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोडबल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यात. मोहाडी पोलीस, वाहतूक पोलिस आणि ग्रामस्थांनी अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करून खोळंबलेली वाहतूक तब्बल तीन तासानंतर सुरळीत करण्यासाठी मदत केली.
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या कन्येच्या नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्याच्या निमित्ताने महाराजांवर झालेल्या वैयक्तिक टीकेमुळे ते अत्यंत व्यथित झाले आहेत. साधेपणाचा उपदेश देणाऱ्या महाराजांच्या मुलीचा साखरपुडा थाटात झाल्याने सोशल मीडियावर टीका झाली होती, विशेषतः मुलीच्या पेहरावावरून आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या होत्या. या टीकेमुळे कंटाळलेल्या महाराजांनी थेट कीर्तनसेवा थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले असतांनाच आता दहा नोहेंबर रोजीचा बदगी येथील किर्तनातील एक व्हिडीओ समोर आला असुन त्यात महाराजांनी लग्न जोरात करेल काय बोंबलायच बोबला म्हटलय.
परभणी शहरासह जिल्हाभरात मागच्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका प्रचंड वाढलाय तापमान हे दहा अंशाखाली असल्यामुळे सर्वत्र जोरदार थंडी पडली जिल्ह्याचे तापमान आज 8.5 एवढे नोंदवल्या गेले असून काल हेच तापमान 7.9 होते यामुळे परभणी मध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या ही रोडावली आहे तर ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये ही शेकोट्या पेटत आहेत
मद्यपी चालकांवर एसटी महामंडळाचा उतारा
नव्या बसेसमध्ये ब्रेथ ॲनालायझर यंत्रणा बसवण्यात येणार
ह्या यंत्रणेमुळे चालकाने मद्यपान केलेले आढळल्यास बसचे इंजिन सुरु होणार नाही
प्रवाशांच्या जीवाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि नशेतील चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका टाळण्यासाठी निर्णय
एसटीच्या ताफ्यात सध्या जवळपास १६ हजार बसेस, ज्यातील जुने वाहने टप्प्याटप्प्याने बाद करत पुढील आर्थिक वर्षात ८ हजार नव्या बसेस खरेदी करण्याचे नियोजन
ज्यातील ५ हजार बसेसमध्ये डिजिटल माॅनिटरिंग, सेन्सर आणि सुरक्षा व्यवस्थांसह ब्रेथ ॲनालायझर बसविलेले असणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.. माजलगाव मतदार संघातील माझे विरोधक व त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची परळी तालुक्यातील नाथरा येथील फार्म हाऊसवर बैठका होत आहेत.याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचे प्रकाश सोळंके यांनी म्हटले असून याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना अजित पवारांना यापूर्वीच कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले
विधानसभेत देखील माझ्या विरोधात त्यांनी दोन दोन उमेदवार उभे केले होते तेच आता देखील होणार आहे.असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.दरम्यान माझ्या मतदारसंघातील धारूर व माजलगाव या नगरपालिकेच्या निवडणुका होत असून या ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा होती.. परंतु भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या दोन्ही ठिकाणी भाजपच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल दिला आहे.त्यामुळे आमची राजकीय ताकद वापरून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रकाश सोळुंके यांनी म्हटले आहे. दरम्यान आता आमदार सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची पक्ष काय दखल घेतो आणि धनंजय मुंडे या सर्व आरोपांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.. माजलगाव मतदार संघातील माझे विरोधक व त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची परळी तालुक्यातील नाथरा येथील फार्म हाऊसवर बैठका होत आहेत.याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचे प्रकाश सोळंके यांनी म्हटले असून याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना अजित पवारांना यापूर्वीच कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले
विधानसभेत देखील माझ्या विरोधात त्यांनी दोन दोन उमेदवार उभे केले होते तेच आता देखील होणार आहे.असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.दरम्यान माझ्या मतदारसंघातील धारूर व माजलगाव या नगरपालिकेच्या निवडणुका होत असून या ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा होती.. परंतु भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या दोन्ही ठिकाणी भाजपच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल दिला आहे.त्यामुळे आमची राजकीय ताकद वापरून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रकाश सोळुंके यांनी म्हटले आहे. दरम्यान आता आमदार सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची पक्ष काय दखल घेतो आणि धनंजय मुंडे या सर्व आरोपांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.. माजलगाव मतदार संघातील माझे विरोधक व त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची परळी तालुक्यातील नाथरा येथील फार्म हाऊसवर बैठका होत आहेत.याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचे प्रकाश सोळंके यांनी म्हटले असून याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना अजित पवारांना यापूर्वीच कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले
विधानसभेत देखील माझ्या विरोधात त्यांनी दोन दोन उमेदवार उभे केले होते तेच आता देखील होणार आहे.असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.दरम्यान माझ्या मतदारसंघातील धारूर व माजलगाव या नगरपालिकेच्या निवडणुका होत असून या ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा होती.. परंतु भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या दोन्ही ठिकाणी भाजपच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल दिला आहे.त्यामुळे आमची राजकीय ताकद वापरून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रकाश सोळुंके यांनी म्हटले आहे. दरम्यान आता आमदार सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची पक्ष काय दखल घेतो आणि धनंजय मुंडे या सर्व आरोपांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सलग दुसऱ्या दिवशी परभणीचे तापमान घसरले
जिल्ह्याचे तापमान हे 8.5 अंशावर
सर्वात थंडीचा कडाका वाढला
परभणी जिल्ह्यातील सात नगरपरिषदांमध्ये निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची निवडणूक होतेय ती म्हणजे जिंतूर नगरपरिषदेची कारण इथे भाजप नेत्या तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पनाला लागलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी उमेदवार उतरवला आहे दुसरीकडे कांग्रेस नेही मुस्लिम कार्ड खेळल्याने जिंतूर मध्ये बिग फाईट बघायला मिळत आहे.भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख यांनी विरोधी राष्ट्रवादीच्या काळात जिंतूरचा कुठलाही विकास झाला नाही शहराला घाणीत लोटण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप केलाय तर मागच्या एक वर्षापासून शहराच्या नेत्या पालकमंत्री असताना त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सबिया बेगम कपिल फारूखी यांनी भाजपवर केलाय त्यामुळे अर्ज भरण्या आधीच जिंतूरमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत..
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यास अध्यक्ष उध्दव ठाकरेच
शासन निर्णय काढून सरकाची घोषणा
आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून ५ वर्षांसाठी नियुक्ती
उद्धव ठाकरे सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांची पाच वर्षाकरिता करण्यात आली नियुक्ती
तर शिशिर शिंदे आणि पराग कळवणे यांची ३ वर्षाकरिता नियुक्ती
पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचीही नियुक्ती
मेळघाटात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का...
उबाठाचे मेळघाट विधानसभा प्रमुख सुनील चौथमल यांचा भाजपमध्ये प्रवेश..
धारनी नगरपंचायत मधून नगराध्यक्षाची तिकीट सुनील चौथमल यांना ?
उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि मेळघाट विधानसभा प्रमुख सुनील चौथमल यांनी अमरावतीत येऊन भाजपात प्रवेश घेतला.. भाजप निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, खासदार अनिल बोंडे, माजीमंत्री प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला..
सुनील चौथमल यांचा भाजपचा दुपट्टा देत भाजपा मध्ये पक्षप्रवेश करून घेण्यात आला. त्यांना भाजपकडून धारणी नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सुद्धा देण्यात आली असल्याची माहिती आहे..
धारनी नगरपंचायत क्षेत्रात सुनील चौथमल यांचे मोठे प्रस्थ आहे, चौथमल कुटुंबीयांचे धारणी नगरपंचायत क्षेत्रात मोठी ताकद आहे. दोन दिवसांपूर्वी चिखलदरा नगरपरिषद मधून अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांनी देखील भाजपा मध्ये पक्ष प्रवेश झाला होता, एकूणच अमरावतीमध्ये भाजपमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये इन्कमिंग जोरात सुरु आहे....
नाशिकच्या भगूर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत मोठी फूट पडली आहे. शिंदेच्या शिवसेनेला एकटे पाडण्यासाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे, भगूर नगरपरिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे, या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी केली आहे..राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर उद्या शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.महायुतीतील या अनपेक्षित घडामोडीमुळे भगूरच्या राजकारणाचे चित्र पूर्णपणे बदललंय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: जिथे जिथे शक्य, त्या ठिकाणी महायुती करायची; देवेंद्र फडणवीसांची भूमिका