मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर बोलत होते. या विधेयकावर ते बोलत असताना इतिहासातील विविध दाखले देत होते. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासंदर्भातील एक दाखला देण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन सभागृहात वाद निर्माण झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले, यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागितली.

Continues below advertisement

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्याकडून माफी

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर  शिवसेनेचे शंभूराज देसाई, दादा भुसे, नितेश राणे आक्रमक झाले. शंभूराज देसाईंनी जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य पटलावरुन काढून टाकण्याची मागणी केली. यावेळी आक्रमक झालेल्या भाजप आमदारांमुळं सभागृह तहकूब करण्यात आलं. सभागृह पुन्हा सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सभागृहात आले. राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. 

भाजपचे मंत्री नितेश राणे, आमदार योगेश सागर, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे, अशी मागणी केली. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशानं दिलगिरी व्यक्त केलेली होती. सभागृहातील आमदारांची आक्रमक भूमिका लक्षात घेता राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना माफी मागण्यास सांगितलं. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागितली. 

Continues below advertisement

 जितेंद्र आव्हाड धर्मस्वातंत्र्य विधेयकावर काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांनी धर्मस्वातंत्र्य या बिलावर बोलताना म्हटलं की आमचा या बिलाच्या हेतुला विरोध आहे. ⁠जबरदस्तीने धर्मांतर याला आमचा विरोध आहे. ⁠धर्मस्वातंत्र्य या नावाने बिल आणण म्हणजेच संविधानाला छेद देण आहे. ⁠बुद्धांनी केलेल धर्मांतर हे या देशातील पहिलं धर्मांतर आहे. हे बील पूर्वलक्षी प्रभावानं लागू केलं तर बुद्ध, जैन आणि बसवेश्वर यांना ही आता जेलमध्ये जावा लागल असतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मस्वातंत्र्याचा अधिकार संविधानात दिलाय. पण त्याच नावाने महाराष्ट्रात बिल आणणं हे संविधानाला छेद देणे आहे. बुद्धांनी केलेलं धर्मांतर हे पहिलं धर्मांतर आहे. पण आजच्या कायद्याने ⁠बुद्ध, महावीर जैन आणि बसवेश्वर यांनाही आता जेलमध्ये जावं लागलं असतं. जबरदस्तीने धर्मांतराला आमचा विरोधच आहे, मात्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाच्या हेतूला आमचा विरोध आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.