जालना : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे (Mumbai) मोर्चा वळवणार आहेत. मात्र, ओसीबी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक शरद पवारांना लक्ष्य केलं जातं. सध्या ओबीसी (OBC) आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या लक्ष्मण हाके यांनीही गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर आक्रमकपणे टीका केली असून आमदार गोपीचंद पडळकर हेही सातत्याने शरद पवारांना लक्ष्य करताना दिसून येतात. आता, शरद पवारांवर टीका करणाऱ्यांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev jankar) यांनी यांनी पलटवार केला आहे. शरद पवारांसाठी ढाल बनून जानकर पुढे आले असून ओबीसी समाजासाठी शरद पवारांचं योगदान असल्याचंही त्यांनी म्हटलं.  

Continues below advertisement

क्रांती दिनाचे औचित्य साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ओबीसी मंडल यात्रा सुरू केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना आता महादेव जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा आज जालन्यात दाखल झाली आहे. ओबीसीच्या हिताचे प्रश्न घेऊन ही यात्रा जात असल्यामुळे मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी मी स्वतः हजर झालो असल्याचं जानकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. तसेच ओबीसीच्या हिताचा निर्णय घ्यायचे काम शरद पवार यांनी केलं आहे. आंब्याच्याच झाडाला माणसं दगड मारतात, ज्याला फळ नसतं त्याला कोणी दगड मारत नाही, असे म्हणत ओबीसीच्या भूमिकेवरुन शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना जानकरांनी टोला लगावला आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असलेल्या महादेव जानकर यांनी पुन्हा महायुतीची साथ सोडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत ते ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातही दिसून आले होते. तर, राज्यातील महायुती सरकारवर आणि भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे, महादेव जानकर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत येतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Continues below advertisement

महायुती, वंचित आघाडीची शरद पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात मंडल यात्रा काढण्यात येत आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधत नागपुरातून सुरू केलेल्या मंडल यात्रेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. दरम्यान, शरद पवार यांनी काढलेल्या मंडल यात्रेवर महायुती आणि भाजपनं सडकून टीका केली टीका केली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी टीका करत गंभीर आरोप केले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या स्कॉलरशिपला राष्ट्रवादीकडून विरोध करण्यात आला होता. ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय, श्रीमंत मराठा हा एनसीपीचा ( NCP) बेस आहे. श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात ओबीसी जाणार नाही, हाच या पाठीमागचा राजकीय हेतू आहे. असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

हेही वाचा

आयशरच्या धडकेत महामंडळाच्या बसचा चेंदामेंदा; अपघातानंतर प्रवाशांचा आक्रोश, 1 ठार 25 जखमी