Prakash Ambedkar on Manoj Jarange: राज्यात मराठा आरक्षण प्रश्न तापलेला असताना सगे सोयरेंच्या मागणीसह सरसकट मराठ्यांना आरक्षणाचा विषय आंदोलक मनोज जरांगे यांनी लाऊन धरला आहे. दरम्यान त्यांची मागणी मान्य झाली नाही तर ते 288 जागेवर निवडणूक लढवतील असे त्यांनी सांगितले होते. यावर जरांगे पाटील यांनी 288 जागा मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी लढवणं आवश्यक आहे. आरक्षण बचाव रॅली आज लातूर जिल्ह्यात दाखल झाली. असं  ते निलंगा येथे बोलत होते. 


गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अनेकवेळा उपोषण केलं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा मनोज जरांगे यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण वाचावं यासाठी उपोषण केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. 


काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 


प्रकाश आंबेडकर यांनी आज लातूर ते उजनी, औसा, लामजना, निलंगा, निटुर आणि त्यानंतर लातूर शहरात आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली. यावेळी ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी 288 जागा मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी लढवणं आवश्यक आहे. सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचण्यासाठी, मनोज जरांगे यांनी 288 जागा या लढवल्या पाहिजेत.


मराठ्यांचे प्रश्न वेशीवर टांगली जाईल


 गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी या निवडणुकीच्या माध्यमातून वेशीवर टांगल्या जातील. राज्यातील श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याला संपूर्णपणे दाबून टाकत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी निवडणुकीला मनोज जरांगे यांनी सामोरे जावे. श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयरीक करायला तयार नाही. याच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड या भागातून श्रीमंत मराठे स्वतःला उत्तर प्रदेशमधील लोकासारखं सिंग म्हणून घेण्याची सुरुवात करत होते..मात्र, मोठ्या प्रमाणात टिंगल टवाळी झाल्यानंतर तो विषय मागे पडला. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


प्रकाश आंबेडकरांनी घेतली पंकजा मुंडेंची भेट


वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपच्या नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भेट झाली. लातूरहून बीडकडे येत असताना प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांनी घेतली भेट.  प्रकाश आंबडेकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरु आहे. ही यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे.   त्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं.पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण झाली. 


हेही वाचा:


राजकारणातील सर्वात मोठी भेट, पंकजा मुंडे-प्रकाश आंबडेकरांच्या भेटीने नव्या राजकारणाची नांदी?