मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत सभागृह नेते म्हणून विधिमंडळ अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची मैत्री पाण्यासारखी आहे, कोणी किती प्रयत्न केले तरी आम्ही वेगळे होणार नाही, असं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना शायरी देखील केली. 

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांसोबतची मैत्री पाण्यासारखी

मी आपल्याला एवढंच सांगतो देवेंद्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. आमचा अजेंडा काय आहे, या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राचा विकास करणं. या महाराष्ट्राची प्रगती करणं या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण हे आमचं काम आहे.मी सांगतो "हम वो नही जो दिल तोड देंगे, हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, पाणी की तरह ये दोस्ती हमारी, पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे हम जुदा नही होंगे, अशी शायरी करत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या मैत्रीबाबत भाष्य केलं. 

काही लोक आहेत ना मनामध्ये त्यांच्या उकळ्या फुटतात अरे यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे. काय चालू नाही, आम्ही रोज एकमेकांशी बोलतो. एकमेकाशी संपर्क असतो आमचा कुठे काय झालं कुठे काय करायचं हे सगळं आहे. आमचा अजेंडा स्वार्थ नाही, आमचा अजेंडा परमार्थ आहे. लोकांना मदत करण आमचा अजेंडा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Continues below advertisement

मोदी, योगी कोणाला सोडणार नाहीत

अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी, कठोर कारवाई होते आहे.मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाही ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाहीत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की आज जे टीका करता आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याच पाप केलं. तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान,  एकनाथ शिंदे यांनी गोंधळलेला आणि भरकटलेला असा विरोधी पक्ष या ठिकाणी पाहायला मिळाला. सभागृहामध्ये तुम्ही जरी संख्येने आमच्यापेक्षा कमी असलात तरी सुद्धा भुजबळ साहेब एकटेच होते. सभागृहामध्ये ते लोकांच्या प्रश्नावर आणि समस्यांवर वाचा फोडायचे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.