Devendra Fadnavis On Heavy Rain In Marathwada: मराठवाड्यत पावसाने (Heavy Rain In Marathwada) हैदोस घातलाय. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय. गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. काल (24 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

Continues below advertisement

विस्कटलेला संसार, मोडलेली घरं, झोपलेली पिकं आणि विस्कटलेली मनं मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक घराला अंधाऱ्याच्या साम्राज्यानं ग्रासलंय. पुराच्या पाण्यानं सारं (Flood In Marathwada) धुवून आणि खरवडून निघालंय. नजर जाईल तिथवर पाणी आणि नजरेतही न मावणारं पाणी...मराठवाड्याची हीच कहाणी अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला घर पाडणारी आहे. मराठवाड्यात 21 सप्टेंबरपर्यंत 23 लाख 414 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, मराठवाड्यात अचानक अतिवृष्टी का झाली, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Marathwada Heavy Rain)

मराठवाड्यातल्या महाप्रलायचं सर्वात मोठं कारण आहे क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल...हवामान बदलाचा परिणाम मराठवाड्यावर सर्वात जास्त होताना दिसतोय. मराठवाड्याला गेल्या दहा ते पंधरा वर्षात दुष्काळ गारपीट आणि अतिवृष्टी अशा संकटाला सामोरे जावं लागतंय. त्यावर जागतिक बँकेनं दिलेले सहा हजार कोटी हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी खर्च करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

Continues below advertisement

मराठवाड्यावरील अस्मानी संकट आणखी गडद होणार- (Flood In Marathwada)

बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा (Maharashtra Heavy Rain) इशारा देण्यात आलाय. पुढील 5 दिवसांत राज्यातील सर्वच भागात धुंवाधार पाऊसाचा इशारा आहे. विदर्भातील काही भागात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर  मराठवाड्यातील काही भागात आजपासून 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. मराठवाड्यात 27 सप्टेंबरला काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा आहे. 

संबंधित बातमी:

Ajit Pawar Beed Rain: आम्ही कुठेही वगळा-वगळी करत नाही; निवेदनकर्त्याला अजितदादांनी सकाळीच झापले, बीडमध्ये काय घडले?