Continues below advertisement

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने आजच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय दिला असून 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडा, असे आदेश दिले आहेत. दुसरीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून निवडणुकांची जुळवाजुळव सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती (Mahayuti) एकसंघ निवडणुका लवढणार आहे, तर महाविकास आघाडीचं अद्याप ठरलेलं नाही. मात्र, मुंबई (Mumbai) महापालिका आपल्याच ताब्यात असावी, यासाठी ठाकरे बंधूंची युतीही जोरदार चर्चेत आहे. मात्र, मुंबई महापालिकेवर यंदा महायुतीचाच भगवा फडकणार, मुंबई महापालिकेवर महापौर महायुतीचाच होणार, असे म्हणत भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे (Shivsena) गटाला आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे यावेळी फडणवीसांनी राजकीय आठवण सांगत उद्धव ठाकरेंना एक गाणंही समर्पित केलं.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचा विजयी संकल्प मेळावा आज मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी ब्राह्मोस मिसाईल सारखा विरोधकांवर हल्ला चढविला, आता आपल्याला कोणी आता थांबवू शकत नाही. मागच्या महापालिका निवडणुकांवेळी आपण थोडक्याने वाचलो होतो, केवळ दोनच नगरसेवक कमी पडले होते. आपल्याला माहिती आहे की कमी पडल्यावर काय करायचे ते, असे म्हणत फडणवीसांनी महापौरपदसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं सूचवलं. गत निवडणुकांवेळी उद्धवजी यांची इच्छा होती की महापौर आमचा असावा, असे शिवसेना म्हणाली. तेव्हा आपण क्षणाचाही विलंब लावला नाही. आपण सगळ्यांना बोलवले, तेव्हा सगळे बोलले एक पाऊल मागे घेऊन त्यांना महापौरपद देऊ. त्यानुसार, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष सगळे तुम्ही घ्या, आम्ही विरोधक म्हणून काम करणार नाही. पण, जर तुम्ही कुठे चुकला तर आम्ही अंकुश ठेऊ, असे आपण सांगितले. पण, 2019 ची निवडणूक आली आणि मग मला गाणे गावे लागले की “अछा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार नेही लूट लिया घर यार का”.. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी उपकाराची जाणीव ठेवली नसल्याचं फडणवीसांनी गाण्यातून सांगितलं.

Continues below advertisement

तुम्ही ब्रँड नाही - फडणवीस

आम्ही लढणारे, आहोत रडणारे नाही. 2022 ला आम्ही गनिमी कावा दाखविला आणि 2024 ला आम्ही पूर्ण बहुमताचे सरकार आणले. काहीही झाले तरी मुंबईत महायुतीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही, कोणी सोबत आले तरी, कोणी सोबत नाही आले तरी मुंबईत महापौर महायुतीचाच होणार असेही फडणवीसांनी ठणकावून सांगितले. साधी बेस्टची निवडणूक होती, कशाला पक्षावर लढतात तर म्हणाले आमचा ब्रँड आहे. आमचे शंशाक राव आणि प्रसाद लाड दरेकर यांनी दाखवून दिले. अरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहेत, तुम्ही ब्रँड नाही, असे म्हणत फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा

जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण