नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनावेळी कांद्याला हमी भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली. सरकारने 1 रुपये दिलेले अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असा अरोप यावेळी करण्यात आला. कांद्याला 1 रुपया नाही तर 5 रुपये किलो अनुदान द्यावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सरकारला लक्ष्य केले. त्यांनी यावेळी कांद्याच्या प्रश्नावरून मंत्री सदाभाऊ खोत यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याच पक्षाने सरकारला लक्ष्य केल्याने, राज्य सरकारमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.