नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये धुवाधार पाऊस सुरु असून, काल सकाळी 8 वाजल्यापासून ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात इगतपुरीत 220 मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये 148 मिमी पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. गेल्या 24 तासात बरसलेल्या पावसाने बळीराजाही चांगलाच सुखावला आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह दिंडोरी, पेठ, निफाड, सिन्नर, चांदवड, देवला, येवला, नंदनगाव, मालेगाव आदी परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 45.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिम पट्ट्यासह पूर्व भागातही पावसानं दमदार हजेरी लावल्याने, भाताच्या रोपांना नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासात बरसलेल्या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे.
पावसाची ही स्थिती अशीच कायम राहिल्यास खरीप हंगामातील भात लागवडीस वेग येण्यास मदत मिळेल. दरम्यान, काल आणि आज बरसलेल्या पावसामुळे नाशिक परिसरातील वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.