नाशिक ते मुंबई दरम्यानचा सर्वात आव्हानात्मक पट्टा हा कसारा घाटाचा आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या लोकलची चाचणी कसारा घाटात केली जाणार आहे. त्यानंतर नाशिक-मुंबई लोकल सेवेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या लोकलचे डबेही चेन्नईतल्या कारखान्यात बनवण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरु आहे. नुकतेच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि शिष्टमंडळाने चेन्नईत जाऊन या लोकलच्या कामाची पाहणी केली. ही लोकल 12 डब्यांची असून त्यात एकावेळी अठराशे प्रवाशांची बसण्याची क्षमता असेल.