ब्रिंक्स इंडिया कंपनीचे अक्षय बागुल आणि विशाल निकुंभ हे दोन कर्मचारी सिटी सेंटर मॉलमधून बाहेर पडताच त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत तीन चोरांनी त्यांना पिस्तुल रोखत मारहाण केली आणि त्यांच्या जवळील 20 लाख 45 हजार रुपयांची बॅग घेऊन ते पसार झाले.
ब्रिक्स इंडिया कंपनी व्यापारी तसेच उद्योजकांकडून पैसे घेऊन बँकेत भरणा करण्याचे काम करते.
आज सकाळपासून चार ते पाच व्यापाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांनी पैसे गोळा केले होते. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मागील महिन्यात गंगापूर रोडवरील सारस्वत बँकेतून सराफ व्यवसायिकांची 28 लाख रुपयांची बॅग चोरत्यांनी लांबवल्याची घटना समोर आली होती. त्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसून अशाप्रकारे चोऱ्या करणारी एक टोळीच शहरात कार्यरत असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय.