Pankaja Munde : संतोष देशमुख प्रकरणातील (Santosh Deshmukh Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) फरार असताना दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्र (Swami Samarth Kendra) येथे आल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले असून या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. त्यातच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आज रविवारी (दि. 09) नाशिकमध्ये दाखल झाल्या असून स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Continues below advertisement

खंडणी प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराड याचा पोलीस शोधत होते, तेव्हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आण्णासाहेब मोरे म्हणजे गुरू माऊली यांच्या  आश्रमात 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते आश्रमाच्या बाहेर निघून गेले, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. दिंडोरीच्या आश्रमात जर त्यांना आश्रय दिलं गेला असेल तर तेथील जे प्रमुख आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना देखील सहआरोपी केलं पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते. यानंतर दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आयडीचे अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते. त्यांनी आमचे सीसीटीव्ही तपासले.  त्यात वाल्मिक कराड 16 तारखेला दर्शनासाठी आले आणि निघून गेलेत. दत्तजयंतीचा सप्ताह आमच्याकडे होता तेव्हा ते आले होते. त्यावेळी असंख्य भाविक आमच्याकडे आले होते. त्यामध्ये कोण आले हे  आम्हाला माहिती नव्हते, असे स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी म्हटले होते.  

स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंची उपस्थिती

आता नाशिकमध्ये स्वामी समर्थ केंद्र प्रणित जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांची हजेरी लावली आहे. मात्र या कार्यक्रमाला स्वतः अण्णासाहेब मोरे अनुपस्थित असल्याचे दिसून आले. अण्णासाहेब मोरे यांचा मुलगा आबासाहेब मोरे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहे. पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.  

Continues below advertisement

स्वामी समर्थ केंद्र यापुढे कोणत्याही विषयात पडणार नाही

दरम्यान, आज स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे कार्यक्रमातील भाषणात बोलताना म्हणाले की, स्वामी समर्थ केंद्र या पुढे कोणत्याही विषयात पडणार नाही. कारण चांगले काम करताना खूप कष्ट घ्यावे लागतात पण चुकीचे कोणीतरी काही तरी बोलत आणि त्यावर बातमी होते, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांचा आबासाहेब मोरे यांच्याकडून समाचार घेण्यात आला.  

आणखी वाचा 

Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण