नाशिक : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. नाशिकच्या सात धरणांमधून सध्या विसर्ग सुरु असल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्यातच रविवारी गिरणा नदीच्या (Girna River) पाण्यात मासे पकडायला गेलेले 15 जण अडकल्याची घटना घडली. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने हे 15 जण तब्बल 15 तासांहून अधिक कालावधी उलटूनही नदीपात्रातून अडकले होते. आता या तरुणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे (Helicopter) बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे नदीत अडकलेल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

  


जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथील गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 15 जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकलेले होते. त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Nashik Rain Update)  सुरु असल्याने गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अडचणी येत होत्या. 


15 तरुणांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढले


तब्बल 15 तासांहून अधिक कालावधी उलटूनही 15 जणांना अद्याप नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढता आलेले नव्हते. मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ (SDRF) जवानांकडून तरुणांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने तरुणांना बाहेर काढण्यास अडथळे निर्माण होत होता. नाशिकच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद (Maulana Mufti Mohammad) हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अडकलेल्या तरुणांना जेवण पोहचवण्यात आले. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेवून 15 जणांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली होती. नुकतीच या 15 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.


 



दरम्यान, या तरुणांना वाचविण्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची टीम रात्री घटनास्थळी दाखल झाली. मात्र रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबविण्यात आले होते. सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचावकार्यात अडचणी पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावर असल्यामुळे सुखरूप होते. आज लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. त्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या तरुणांनी तब्बल 15 तासांनी सुटकेचा निश्वास सोडला.


इतर महत्त्वाच्या बातम्या


नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, संपूर्ण जिल्ह्याला 'यलो अलर्ट'!


Nashik Rain : हृदयद्रावक... रामकुंडात तरणाबांड पोरगा गेला, आईने टाहो फोडला; सुदैवाने बचावली तीन वर्षांची चिमुकली