नागपुरात आयोजित संकल्प विदर्भ निर्मिती सभेत ते बोलत होते. आगामी निवडणुकीसाठी सर्व विदर्भवादी संघटना एकत्र आल्या असून विदर्भ निर्माण महासंघाची निर्मिती करण्यात आली आहे. या महासंघाच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अणे म्हणाले की, आम्हाला 'जय भवानी जय शिवाजी' किंवा 'जय महाराष्ट्र' म्हणण्यात कुठलीही लाज वाटत नाही. मात्र, आम्ही तितक्याच ताकदीनं 'जय विदर्भ' देखील म्हणतो, असे अणे म्हणाले.
आमचं महाराष्ट्राशी वैर नाही तर आमचं त्या चोर पक्षांशी आणि नेत्यांशी वैर आहे ज्यांनी विदर्भाची लूट चालवली आहे. काही नेते शिवाजी महाराजांना पुढं करत मागं लपतात. शिवाजी महाराजांना काढून घेतलं तर या नेत्यांचा खरा मुखवटा दिसेल, अशी टीकाही त्यांनी सेनेच्या नेत्यांवर अप्रत्येक्षपणे केली.