दीड तासाच्या खोळंब्यानंतर लोकल वाहतूक सुरु
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2016 06:22 AM (IST)
मुंबई : तब्बल दीड तासाच्या खोळंब्यानंतर पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक सुरु झाली आहे. अंधेरी स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत झालेला दुरुस्त करण्यात प्रशासनाला यश आलं. परंतु बिघाड दुरुस्त झाला असला तरी लोकलसेवा एक तास उशिराने सुरु आहे. दरम्यान, मुंबईकरांची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेन सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत झाली होती. अंधेरी स्टेशनजवळ स्लो ट्रॅकवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. लोकल ट्रेन अंधेरी ते जोगेश्वरीदरम्यान उभ्या होत्या. मात्र या बिघाडामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.