50 वर्षीय विनोद गगड हे व्यापारी राजस्थानहून मुंबईला येत होते. वसई रोड आणि नालासोपारा या दोन स्टेशन्सच्या मध्यभागी सिग्नलवर रेल्वे थांबली होती. वसईला थांबा नसल्यामुळे सिग्नलला ट्रेन थांबली असताना ते उतरले आणि ट्रेनच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गगड हे भिवंडीतील अजंठा कंपाऊंड, धामणकर नाका परिसरातील पुष्प प्लाझा या इमारतीत राहत होते.
दुसऱ्या घटनेत प्रमोद गुप्ता हा तरुण जखमी झाला आहे. कानात हेडफोन लावून रुळावरुन जाताना प्रमोदला लोकलची धडक बसली. या दोन्ही घटनांची वसई लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.