मुंबई : शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज संपल्यामुळे तेलतुंबडे यांना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टासमोर सादर करण्यात आलं. एनआयए कोर्टाने आनंद तेलतुंबडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पाच जूनला संपणार आहे.


सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपताच तेलतुंबडे हे मुंबईतील एनआयए मुख्यालयात तपासयंत्रणेपुढे शरण आले होते. त्यानंतर एनआयए कडून त्यांना अटक करण्यात आली. तर माओवादी तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले गौतम नवलखा हे दिल्लीत एनआयएपुढे शरण आले असून त्यांना तिथं अटक करण्यात आली आहे. गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे हे दोघेही एल्गार परिषदेशी संबंधित असून भीमा-कोरेगाव प्रकरणात त्यांच्या सहभागाबाबतही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्याबाबत चौकशी आणि अधिक तपास सुरू असल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं आहे.


एन-95 मास्कच्या दरनिश्चितीाबाबत भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश


शहरी नक्षलवाद प्रकरण
शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गाडलिंग, वरवरा राव यांच्यासह इतर आरोपींकडून जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध जोडलेली अनेक कागदपत्र जप्त केली आहेत. त्यात या आरोपींनी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध कसे ठेवले आहेत याचा उल्लेखही या कागदपत्रातून करण्यात आला असल्याचा तपासयंत्रणेचा दावा आहे. तसेच आनंद तेलतुंबडे हे प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असून अश्या संस्थांमध्ये लोकांची भरती करणे आणि या संस्थांसाठी निधी गोळा करण्याचे कामही ते पाहत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


SC on Covid-19 Tests | कोरोनाच्या सर्व टेस्ट मोफत करा : सुप्रीम कोर्ट