कल्याण : व्हॉट्स वापरणाऱ्यांनी कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. उल्हासनगरमध्ये वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं व्हॉट्सअॅप ग्रुपच्या एका सदस्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.


विनय कलनानी असं या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्याचं नाव आहे. शनिवारी विनयने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे भावना दुखावल्याचा आरोप ग्रुपमधील इतर सदस्यांनी केला. इतकंच नाही, तर त्यांनी याची तक्रार करण्यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठलं.

त्यानंतर पोलिसांनी विनय कलनानीला अटक केली. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर कुठलीही पोस्ट टाकताना विचार करुन टाकणं गरजेचं झालं आहे.