ठाणे : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेटमधल्या रायलादेवी तलावात ही दुर्दैवी घटना घडली.


यश खरात (वय, 10 वर्षे) आणि प्रज्ञेश शिंदे (वय, 15 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या दोन मुलांची नावं आहेत. हे दोघेही मुलुंडच्या अशोक नगर परिसरात राहत होते. यश आणि प्रज्ञेश यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकूण 5 मुलं पोहायला रायलादेवी तलावात गेली होती. ते दोघे बुडत असताना त्यांच्यासोबतचे इतर तीन मुलं घाबरुन पळाली आणि हे दृष्य पोलीस मित्राने पाहिलं, त्यानंतर दोघांची तलावात शोधाशोध केल्यानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले.