मुंबई : मध्य रेल्वेवरील दिवा आणि कोपर स्थानाकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या तब्बल अर्धा तास उशीरानं धावत आहेत.


हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असला तरीही या मार्गावरील वाहूतक अतिशय धीम्या गतीनं सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

तर तिकडे हार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकात गेल्या 2 तासापासून विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे.