जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो, मुंबईच्या सुरक्षेकडेही लक्ष द्या : शिवसेना
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2017 05:25 PM (IST)
मुंबई : जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात उत्सव साजरा केला जातोय. जीएसटीमुळे जकात नाके बंद झाले आहेत. त्यामुळे शहरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो मुंबईच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आजपासून जकात नाक्यांवरची वसुली बंद झाली आहे. वाशी, ऐरोली, पनवेल, मुलुंड आणि दहिसर या मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील सर्वच जकात नाके बंद झाले आहेत.