मुंबई : राज्य सरकारवर एकापाठोपाठ एक घोटाळ्याचे आरोप विरोधाकांकडून सुरुच आहेत. आधी उंदीर आणि आता कथित चहा घोटाळ्यावरुन विरोधकांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल सुरु केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही या घोटाळा ऐकून अवाक झाल्याची प्रतिक्रिया दिली.


'आपणही चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलो, मात्र चहावरचा इतका खर्च ऐकून आश्चर्य वाटलं.' असा टोला शरद पवार यांनी लगावला.

2015 पासून चहा आणि अल्पोपहारावर झालेल्या खर्चात दरवर्षी दुपटीनं वाढ झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला होता.

काय आहे प्रकरण?

माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार 2015-2016 साली सीएमओमध्ये चहा आणि अल्पोपहारावर 57 लाख 99 हजार 156 रुपये खर्च झाला होता. तो खर्च 2016-2017 मध्ये एक कोटी 20 लाख 92 हजार 972 रुपयांवर पोहचला, असं संजय निरुपम यांनी सांगितलं.

त्यानंतर 2017-2018 वर्षात तर चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये खर्च झाला. म्हणजे गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचं निरुपम म्हणाले.

सीएमओचं स्पष्टीकरण

हा केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी लागणारे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठी होणारा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.

हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे.

पाहा व्हिडिओ :



संबंधित बातम्या :
हा केवळ चहाचा नाही, आतिथ्य खर्च : मुख्यमंत्री कार्यालय

मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा, निरुपम यांचा आरोप

उंदीर घोटाळ्यावरुन विखे पाटलांची चौफेर टोलेबाजी

मंत्रालय नव्हे उंदरालय, शिवसेनेचं टीकास्त्र

उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही?

मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप