विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणणार : विखे-पाटील
‘गेले दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचं कामकाज होऊ दिलं जात नाही. सरकार विरोधी पक्षाच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. राज्यपाल अभिभाषणवर उत्तरही न देता विधानसभा अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकलं त्यामुळे ही घटनेची पायमल्ली आहे. सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. अशी सरकारची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायचं ठरवलं आहे.’ असं विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
विरोधी पक्षाने आज हरिभाऊ बागडेंविरोधात अविश्वासाचा प्रस्तावही दाखल केला आहे. त्यामुळे आता यापुढे विरोधी पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.