पावसाळ्यात ठाणे-पालघर-रायगडात धबधब्यांवर पर्यटनबंदी
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2018 06:28 PM (IST)
ठाणे-पालघर-रायगड जिल्ह्यांतील धबधबे, तलाव आणि धरणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
फाईल फोटो
ठाणे : पावसाळी वातावरणात तुम्ही ठाणे, पालघर किंवा रायगडातील धबधब्यांवर फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमची निराशा होऊ शकते. ठाणे-पालघर-रायगड जिल्ह्यांतील धबधबे, तलाव आणि धरणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यांतील धोकादायक पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिसरात जाण्यास मनाई घालण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत ही बंदी असणार आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.