नवी मुंबई : पनवेलजवळ रेल्वे रुळावर वीजेचा पोल टाकल्याची घटना ताजी असतानाच, आज नवी मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर जिलेटिनच्या कांड्या सापडल्या आहेत. त्यामुळे मोठा घातपात घडवण्याचा कट शिजत असल्याची भीती वर्तवली जात आहे.


नवी मुंबईत रेल्वे रुळांवर विजेचा खांब, घातपाताचा संशय

तळोजा ते नावडे रोड स्टेशनदरम्यान रेल्वे रुळात जिलेटिनच्या चार कांड्या आढळल्या. तळोजा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दिवा-पनवेल मार्गावर मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला

दोन दिवसात रेल्वे ट्रॅकवर अपघाती वस्तू ठेवण्याची ही चौथी घटना आहे. याआधी पनवेलमध्ये गव्हाणफाटाजवळ काल रेल्वे रुळावर वीजेचा पोल टाकण्यात आला होता. तर परवा कळंबोलीजवळ रेल्वे ट्रॅकवर रुळाचा तुकडा ठेवण्यात आला होता.

अकोल्यात रेल्वे ट्रॅकवर दगड ठेऊन घातपाताचा प्रयत्न 

तर आज अकोला-सिकंदराबाद रेल्वे मार्गावर 25 ते 30 किलो वजनाचा मोठा दगड टाकण्यात आला होता. या मार्गावरुन इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार होती. सुदैवाने मोठा अपघात टळला.

उभ्या रेल्वे ट्रॅकवर आडवा ट्रॅक, मुंबईत जनशताब्दी पाडण्याचा प्रयत्न?

रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?

गेल्या महिन्यात ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले होते. या रेल्वे अपघातात 39 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू

कानपूरमध्येही नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदूर-पटना एक्स्प्रेसचा 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरच्या पुखराया स्टेशनजवळ भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरुन 39 प्रवाशांचा मृत्यू