पाणी मागण्याच्या बहाण्याने मुंबईत तृतीयपंथीयांचा दरोडा
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 06:02 PM (IST)

मुंबई : पाणी मागण्याच्या बहाण्यानं तृतीयपंथियांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याची घटना मुंबईतल्या चारकोप परिसरात उघडकीस आली आहे. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 30 वर्षीय प्रिया जेठवा ही महिला घटनेच्या वेळी घरात एकटीच होती. त्यावेळी दोन तृतीयपंथीय पाणी मागण्याच्या बहाण्यानं घरात आले. त्यांनी प्रिया यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध केलं. त्यानंतर तृतीयपंथियांनी 8 लाखांचा ऐवज लुटून पळ काढला. या लुटीप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस फरार तृतियपंथियांचा शोध घेत आहेत.