मुंबई : मुंबई महापालिकेत (Mumbai Mahanagar Palika) एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे आहे. त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी (Mumbai water supply) उपलब्ध करून दिले नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्त्यता समोर येण्यासाठी "मुंबईच्या पाण्याची" एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज (दि.28) विधानसभेत केली. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Mahanagar Palika) 24 तास पाणीपुरवठा (Mumbai water supply) योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला असून या योजनेतची चौकशी करण्यात यावी,असेही आशिष शेलार म्हणाले. 


विधानसभेत आज सत्ताधारी पक्षातर्फे मुंबई, ठाणे , पुणे, नाशिक, नागपूर, या शहरांमध्ये महायुती सरकार तर्फे करण्यात आलेली कामे आणि गतिमान विकास याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आभार मानणारा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाची मांडणी करताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईकरांच्या अजूनही काही अपूर्ण राहिलेले अपेक्षांकडे सरकारचे लक्ष वेधले.


25 वर्षात 30 हजार कोटी रुपये मुंबईकरांकडून वसूल केले


मुंबई आज शहर आणि उपनगरात असमान पाणीपुरवठा होत आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रचंड तुटवडा मुंबईला जाणवत आहे, या पाणीपुरवठ्याचे मुंबई महापालिकेने गेल्या 25 वर्षात 30 हजार कोटी रुपये मुंबईकरांकडून करापोटी वसूल केले. एकाच परिवाराची सत्ता या महापालिकेत आहे, त्यांचाच महापौर, त्यांचीच स्थायी समिती, त्यांनीच निर्णय घेतले तरीही मुंबईकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. त्यामुळे येत्या एक महिन्यात या सगळ्याचा हिशोब देणारी श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणी आमदाराची शेलार यांनी केली


महापालिकेतर्फे मुलुंड आणि वांद्रे पश्चिम म्हणजे एच पश्चिम या दोन प्रभागांमध्ये  प्रायोगिक तत्वावर 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यासाठी 400 कोटी रुपये केवळ कन्सल्टंटला देण्यात आले या ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली असून ठाकरे गट याला जबाबदार आहे. या प्रकरणांमध्ये कुठला गैरव्यवहार झाला?  याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.


मेट्रोचे काम दोन वर्ष आरे कारशेडच्या नावावर रोखण्यात आले


आघाडीचे सरकार असताना मेट्रोचे काम दोन वर्ष आरे कारशेडच्या नावावर रोखण्यात आले, आज मेट्रो सुरू झाल्यानंतर आतापर्यंत आठ कोटी लोकांनी प्रवास केला असून रोज दोन लाख 35 हजार प्रवासी करतात. म्हणजेच ठाकरे गटाने एवढ्या सगळ्या मुंबईकरांची अडवणूक करून ठेवली होती, केवळ अहंकारापोटी आरे कारशेडचे काम अडवण्यात आले. त्यामुळे 10 हजार कोटीने मुंबईचा मेट्रोचा खर्च वाढला. याबाबत एक श्वेतपत्रिका काढून सरकारने नेमके किती हजार कोटीने खर्च वाढला ? या काळात जी वाहनांची वाहतूक झाली त्यातून किती कार्बन उत्सर्जित झाला?  प्रदूषणात किती वाढ झाली ? याबाबतची माहिती मुंबईकरांना द्यावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.


वांद्रे रेक्लमेश येथील एमएसआर डीसीचा भूंखड विकून वांद्रे -वर्सोवा सागरी सेतू पुढे पालघर पर्यंत वाढविण्यात येणार आहे.  त्याला आमचा विरोध नाही. मात्र याच जागेवर एक उद्यान उभारण्याची आमची मागणी मागील काळात शासनाने मान्य केली होती. याबाबत विचार करता या जागेवर आता विविध बांधकाम झाल्यानंतर शिल्लक मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.


कोळी बांधवांचे नुकसान भरपाईत तफावत दूर करा


सागरी सेतूचे काम एमएसआरडीसी करीत असून कोस्टल रोडचे, अर्धे काम मुंबई महापालिका करीत आहे. या कामामुळे कोळी बांधवांचे जे नुकसान होते त्याची मोजदाद करण्याचे सुत्र दोन प्राधिकरणांचे वेगवेगळे असून ते एकच असावे. मुंबई महापालिकेच्या सूत्रानुसार कोळी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी  मागणी आमदार अशी शेलार यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या 


माढ्यात शरद पवारांपुढे उमेदवारीचा पेच, मोहिते पाटील यांच्यावर लक्ष अन्यथा धनगर कार्ड