एसआरए घोटाळा दाबण्याचा सरकारचा डाव, येवले-कडूंची निदर्शनं
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2017 07:54 PM (IST)
या भ्रष्टाचारातील 40 लाख रुपये काळा पैसा पोलिस घेत नाहीत, हे पैसै घ्यावेत म्हणून ही निदर्शनं करण्यात आली. पोलिसांनी आमदार बच्चू कडू आणि संदीप येवले यांना ताब्यात घेतलं.
मुंबई : एसआरए घोटाळा दाबण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा समोर निदर्शनं केली. विक्रोळी एसआरए प्रकल्पातील भ्रष्टाचार संदीप येवले यांनी स्टींग ऑपरेशन करुन समोर आणला होता. या भ्रष्टाचारातील 40 लाख रुपये काळा पैसा पोलिस घेत नाहीत, हे पैसै घ्यावेत म्हणून ही निदर्शनं करण्यात आली. पोलिसांनी आमदार बच्चू कडू आणि संदीप येवले यांना ताब्यात घेतलं.