Mumbai Rains Live Update : आज मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

Maharashtra Mumbai Rains Live : मुंबईत 13 आणि 14 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय कोकण आणि विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jun 2021 07:23 AM
 मृग नक्षत्राने आज वेळापूर आणि परिसराला पावसाने झोडपले , माळशिरस तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस  
माळशिरस तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. चार वाजता सुरू झालेला हा पाऊस सुमारे अडीच तास मुसळधारपणे  कोसळत होता.  या मुसळधार पावसामुळे माळशिरस तालुक्यातील विझोरी पाटी याठिकाणी पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरती सुमारे चार फूट पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती. त्याचबरोबर तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी गावच्या मध्यभागी असणाऱ्या ओढ्यला पूर आला असून वेळापूर गावचे बाजार तळ त्याचबरोबर ओढ्याच्या कडेला असणाऱ्या घरांपर्यंत ओढ्याच्या पात्रातील पाणी पसरले आहे. 
विदर्भातील अनेक भागात पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त 

विदर्भातील अनेक भागात पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त, 


पुढील ३ तास चंद्रपुरातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस ,


गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि नागपुरातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज,

सोलापुरातील बार्शीत मुसळधार पाऊस

सोलापुरातील बार्शीत मुसळधार पाऊस,


सलग दोन दिवस बार्शीत मुसळधार पावसाची हजेरी,


मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतीत पाणी साचलं,


अशाच पद्धतीने पाणी साचून राहिल्यास पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता

चंद्रपूर शहरात जवळपास अर्धा तास कोसळला मुसळधार पाऊस

चंद्रपूर : विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा आणि पावसाची जोरदार हजेरी, चंद्रपूर शहरात जवळपास अर्धा तास कोसळला मुसळधार पाऊस, चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनजवळ एक झाड कोसळल्याची प्राथमिक माहिती

देवगड तालुक्यात पावसाचा फटका, सखल भागातील अनेक रस्ते बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अनेक गावातील सखल भागातील रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते बंद झाले आहेत. खुडी, कोटकामते, दाभोळे, वरेरी, तळेबजार या ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

विजांच्या कडकडाटासह यवतमाळ, अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता 

विजांच्या कडकडाटासह यवतमाळ, अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता , 


वर्ध्यातील हिंगणघाट आणि चंद्रपुरातील ब्रम्हपुरीतही विजांच्या कडकडाटासह पावसाचा नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा

रत्नागिरीत पहाटेनंतर पावसाची विश्रांती, सोमवारपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट

रत्नागिरी : जिल्ह्यात पहाटे 5 नंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली आहे. काल दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाच्या मुळसळधारा कोसळत होत्या. त्यामुळे नदी-नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. शिवाय समुद्राच्या लाटा देखील किनाऱ्याला वेगाने धडकत होत्या. सोमवारपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट असून सध्याचे वातावरण हे पाऊस पूरक असंच आहे. जिल्ह्यात NDRF च्या चार टीम तैनात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा सारासार विचार करता अद्याप तरी संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत नाहीय. पण काही भागातील वातावरण पाहता पुढील काही तासात वरुण राजा जोरदार बॅटिंग करण्याची शक्यता आहे.

मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मान्सूननं मुंबईत धमाकेदार एन्ट्री केली असून मुंबई आणि उपनगरांत आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशातच आज मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र, तो आता ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला आहे. अरबी समुद्रातील सायक्लॉनिक सर्क्युलेशन कमकुवत झाल्याने अलर्ट बदलवण्यात आला आहे. ज्यात मुख्य: पावसाचा अधिकतम पट्टा हा मुंबईच्या दक्षिणेत सरकल्याने रायगड आणि रत्नागिरीत अतितीव्र पावसाची शक्यता आहे. दरम्यान, असं जरी असलं तरी आज मुंबई आणि उपनगरात तीव्र पाऊस अपेक्षित आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट कायम ठेवण्यात आल्याने तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

उद्याचा मुंबई आणि ठाण्याचा रेड अलर्ट ऑरेंज अलर्टमध्ये बदलवला 

उद्याचा मुंबई आणि ठाण्याचा रेड अलर्ट ऑरेंज अलर्टमध्ये बदलवला 


रायगड आणि रत्नागिरीसाठी उद्या आणि परवा रेड अलर्ट जारी 


सिंधुदुर्ग, पालघर उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट


पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट क़ायम ठेवण्यात आला आहे.

पुढील 3 तास बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा 

पुढील 3 तास बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा ,


काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रति तासाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज ,


नाशिक, जळगाव जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित

मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पुढील 3- 4 तासात पावसाची शक्यता

मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पुढील  3- 4 तासात पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाची शक्यता 


मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पुढील ३-४ तास पावसाची शक्यता ,


विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 तासात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 तासात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, नुकतेच रत्नागिरी शहर, आसपासचा परिसर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे एस बॅन्ड डॉप्लर वेदर रडार सुरू

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे एस बॅन्ड डॉप्लर वेदर रडार सुरू झाले आबे. एस बॅन्ड रडारची 500 किमीपर्यंत अंदाज बांधण्याची क्षमता आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर दोनच दिवसात रडार सुरु झाले आहे.  तौक्ते चक्रीवादळावेळी एस बॅन्ड रडार नादुरुस्त झाले होते.

येत्या 48 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा, आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट

येत्या 48 तासात मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, "आज आणि उद्यासाठी मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि पश्चिमी वाऱ्यांनी जोर पकडला आहे त्यामुळे संपूर्ण कोकणात पाऊस असेल, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज, उद्या आणि परवासाठी रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी

येत्या ४८ तासात मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा

येत्या ४८ तासात मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा. आज आणि उद्यासाठी मुंबईत रेड अलर्ट जारी. संपूर्ण कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि पश्चिमी वाऱ्यांनी जोर.  पकडला आहे त्यामुळे संपूर्ण कोकणात पावसाचा इशारा, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. आज उद्या आणि परवासाठी रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट.  सर्वांनी खबरदारी घेण्याचं हवामान विभागाकडून आवाहन

नवी मुंबईत बेलापूर किल्ल्याचा टेहळणी बुरुज पावसामुळे ढासळला

नवी मुंबई महानगरपालिकेसमोर असलेल्या बेलापूर किल्ल्याचा टेहळणी बुरुज पावसामुळे ढासळला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसात भिजल्यामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे बुरुज ढासळून पडला आहे. सीबीडीवरुन उरणला जाणाऱ्या रस्त्यालगत हा बुरुज आहे. पुरातत्व खात्याकडून बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत टेहळणी बुरुजाचे कामही गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. याच्या बांधकामाच्या दर्जावरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी नितीन चव्हाण यांनी सरकारकडे तक्रारही केली आहे. जोरदार हवा असल्याने बुरुज ढासळला असून सुदैवाने त्या ठिकाणाहून जाणाऱ्या गाड्यांवर लोखंडी सळ्या, दगड पडले नाहीत, अन्यथा जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती.

मुंबईत लोकलच्या सर्व मार्गांवरील गाड्या धीम्या गतीने सुरु तर दादर- कुर्ला सेवा सुरु

मुंबईत लोकलच्या सर्व मार्गांवरील गाड्या धीम्या गतीने सुरु आहेत. दुपारी सव्वाबारा वाजता बंद केलेली मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील दादर-कुर्ला स्थानकादरम्यानची सेवा दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी सुरु झाली. हायटाईड आणि जोरदार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर दादर-कुर्ला धीम्या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.

मुंबईतील चेंबूरमधल्या लाल डोंगर परिसरात 2 ते 3 घरे कोसळली

मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे चेंबूर लाल डोंगर परिसरात 2 ते 3 घरे कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चेंबूर लाल डोंगर परिसरात 2 ते 3 घरे कोसळली

चेंबूर लाल डोंगर परिसरात  2 ते 3 घरे कोसळली आहेत, अजून तरी कोणती ही जीवितहानी समोर आलेली नाही

मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरु

मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे आणि त्यामुळे रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी चालवणं अवघड होत आहे. 

मुंबईतील हिंदमाता परिसरात पाणी साठण्यास सुरवात

मुंबईतील हिंदमाता परिसरात जोरदार बरसणाऱ्या सरींमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठण्यास सुरवात झाली आहे. यासोबतच विजांचा कडकडाट आणि पाऊस यामुळे दृश्यमानता देखील कमी झाली आहे. सध्या महापालिका कर्मचारी साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर वाहतूक पोलीस वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. 

मुंबईच्या पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस; चेंबूरमधील टिळकनगर कॉलनी विभाग पाण्याखाली

मुंबई पूर्व उपनगरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, या सर्वच विभागांमध्ये आता रस्त्यांवर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चेंबूरचा टिळकनगर कॉलनी विभाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सगळे रस्ते तीन ते चार फूट पाण्यामध्ये गेलेले आहेत.

मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची दमदार हजेरी, वीजांचा कडकडाटही सुरु

मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची दमदार हजेरी, वीजांचा कडकडाटही सुरु. हवामान खात्याकडून दुपारी समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याचा इशारा. शनिवारी दुपारी हायटाईडच्या वेळी 1.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात 4.32 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नवी मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस

नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असून, सोसाट्याचे वारेही सुटले आहेत. 

वाशिम जिल्ह्यात मृगनक्षत्रात जोरदार पाऊस बरसल्याने बळीराजा खरीप पेरणी साठी सज्ज

वाशिम जिल्ह्यात  मृगनक्षत्रात जोरदार पाऊस बरसल्याने  बळीराजा  खरीप पेरणी साठी सज्ज झाला असून   खरीप पेरणी करिता  लागणारे रासायनिक खते घेण्यासाठी गर्दी करत आहे  गेल्या काही दिवसां पासून रासायनिक खतांचा तुटवडा होता आणि त्यात लॉक डाऊन आणि वाढते कोरोना चे रुग्ण या मुळे शेतकरी थेट कृषी केंद्रावर पोहचला नव्हता मात्र चांगला पाऊस बरसल्याने आता शेतकरी खत खरेदी साठी रांगा लावल्याच चित्र आहे

मुंबई आणि उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा, कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन

मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. आज आणि उद्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. यासोबतच रविवारी अतिवृष्टीचा इशारा देखील मुंबई आणि कोकण किनारपट्टीला देण्यात आला आहे. मुंबईत आज सकाळपासून सायन, कुर्ला, अंधेरी, मानखुर्द, परळ दादर यासह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या सायन परिसरात दृश्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

कल्याण-डोंबिवलीत परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार

दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने काल संध्याकाळपासून कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात हजेरी लावली. रात्रीपासून कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरु असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे.

वसई, विरार, नालासोपाऱ्यात रात्रभर पाऊस, सखल भागातील रस्ते पाण्याखाली

वसई, विरार, नालासोपाऱ्यात रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने शहरातील सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नालासोपारा पूर्व आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, पश्चिमेकडील गास, टाकी पाडा, वसईतील गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, समता नगर, जे बी नगर, विरार पश्चिम विवा कॉलेज रोडवर गुडघाभर पाणी साचलं आहे. काहींच्या दुकानातही पाणी शिरलं आहे. आज दिवसभरात पावसाचा जोर कायम राहिला तर नागरिकांची चिंता वाढू शकते. 

मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच, राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी

मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच असून मध्येच मुसळधार सरी बरसत आहेत. शिवाय, राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची बॅटिंग, जोगेश्वरीत रस्ता जलमय

मुंबईसह पश्चिम उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, सांताक्रूझ, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या सर्व परिसरामध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आह. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या समोर रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही वाहन बंद पडत आहे तर काही वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं. अशातच 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 





विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. अकोला, भंडारा, वाशिम, गडचिरोली आणि गोंदियातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



दरम्यान रत्नागिरीत शुक्रवारी (11 जून) सकाळी साडेआठ वाजल्यापासून रात्रीपर्यंत 92.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सांताक्रूजमध्ये 51.4 मिमी पाऊस पडला. 


मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन


मान्सूननं मुंबईत धमाकेदार एन्ट्री केली असून मुंबई आणि उपनगरांत आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशातच आज मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र, तो आता ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला आहे. अरबी समुद्रातील सायक्लॉनिक सर्क्युलेशन कमकुवत झाल्याने अलर्ट बदलवण्यात आला आहे. ज्यात मुख्य: पावसाचा अधिकतम पट्टा हा मुंबईच्या दक्षिणेत सरकल्याने रायगड आणि रत्नागिरीत अतितीव्र पावसाची शक्यता आहे. दरम्यान, असं जरी असलं तरी आज मुंबई आणि उपनगरात तीव्र पाऊस अपेक्षित आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट कायम ठेवण्यात आल्याने तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 


पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गात आज ऑरेंज अलर्ट असल्याने काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.