Mumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशीराने...
Mumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
abp majha web team Last Updated: 30 Jun 2023 01:26 PM
पार्श्वभूमी
Mumbai Rain Live Updates : आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई,...More
Mumbai Rain Live Updates : आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी झाल्यामुळं रिक्षावाले आणि सामान्य नागरिक हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळं चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून कोणत्याच प्रकारचं नियोजन करण्यात आलं नाही. मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढलामुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही. मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतेय. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी पाऊस सुरु, शेतात पाणी साचल्यामुळं पेरण्या खोळंबल्या
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं जिल्ह्यातील नदीनाले भरून वाहायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा आणि पिंजाळ या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या भात पेरण्या सुरू केल्या होत्या. पण सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं आणि शेतात पाणी साचल्यामुळं त्या पेरण्याही आता खोळंबल्या आहेत. झालेल्या पेरण्याही अतिपावसामुळं आणि पुरामुळं वाया जाण्याची शक्यता आहे.