मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. वांद्रे स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक मंदावली आहे.


 

 

या मार्गावरील अप आणि डाऊन गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऐन पिकअवरला कामावर पोहोचण्याच्या धावपळीत असलेल्या मुंबईकरांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

 

 

हा बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे हार्बर मार्गावरील स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.