या घटनेत संपूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि पाण्याच्या 6 टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच इमारत रिकामी केल्याने जीवितहानी टळली.
हिरानंदानी टॉवर ही कांदिवली पश्चिममधील सर्वात उंच इमारत आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आज लागल्याचा अंदाज रहिवाशांनी वर्तवला आहे.