उमेदवार निवडीवरुन काँग्रेसमध्ये घमासान, निरुपम यांना झटका
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2019 11:56 PM (IST)
काँग्रेसचे दिवंगत गुरुदास कामत यांच्या 'उत्तर पश्चिम मुंबई' या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संजय निरुपम यांची इच्छा होती. मात्र काँग्रेसच्या निवड समितीने निरुपम यांनी 'उत्तर मुंबई' मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी, अशा सूचना केल्याची माहिती आहे.
मुंबई : काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या निवडीवरुन घमासान सुरु असल्याची माहिती आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या इच्छेला काँग्रेसच्या निवड समितीने सुरुंग लावला. निरुपम यांना 'उत्तर पश्चिम मुंबई' ऐवजी 'उत्तर मुंबई' या लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याचे आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे दिवंगत गुरुदास कामत यांच्या 'उत्तर पश्चिम मुंबई' या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संजय निरुपम यांची इच्छा होती. मात्र काँग्रेसच्या निवड समितीने निरुपम यांनी 'उत्तर मुंबई' मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी, अशा सूचना केल्याची माहिती आहे.