मुंबई : पारदर्शक कारभाराचा डंका वाजवणारे मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत का, असा प्रश्न पडला आहे. घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली.


गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी राजीनामा देऊ केल्याची माहिती पुढे आली आहे, तर शनिवारी सुभाष देसाईंनीही राजीनाम्याची तयारी दाखवली. दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी वाचवलं आहे. सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे.

विरोधकांच्या आरोपांनंतर सुभाष देसाईंची राजीनाम्याची तयारी


प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर विरोधकांनी विधान परिषदेत दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवाय या दोन्ही मंत्र्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.

शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठीशी : उद्धव ठाकरे


खरं तर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तातडीनं एकनाथ खडसेंचा राजीनामा घेण्यात आला होता. मात्र तोच न्याय मेहता आणि देसाईंना का लावला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या


प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करणार : मुख्यमंत्री


मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे


सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे


विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता


मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री


'माझा'च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी


मुख्यमंत्र्यांना न सांगताच 'अवगत' शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश