काल रात्री शिवाजीनगर कडून टिकळ टर्मिनर्सकडे जात होती. त्यावेळी रिक्षानं अचानक पेट घेतला.. सीएनजी गॅसची गळती झाल्यानं रिक्षानं पेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिऴाली आहे. यात प्रकरणात एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे.
कुंटुंबातील जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या 8 जखमीमध्ये एकूण 3 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या 5 मुलांमधील दोन महिन्यांची दोन मुलेही आहेत. हे कुंटुंब एका समारंभासाठी कर्नाटकला चालले होते.
पण तीन आसनी ऑटो रिक्षात 9 जण बसलेच कसे असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो आहे.