Manoj Jarange Patil Mumbai Morcha Azad Maidan Live Updates: मुंबईतील CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा - हायकोर्ट
Manoj Jarange Patil Azad Maidan Live Updates: आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पार्श्वभूमी
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Azad Maidan Live Updates: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर (Maratha Reservation Protest Azad Maidan) उपोषण सुरु आहे....More
मुंबईतील CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. उद्या 7 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होते, त्यामुळे न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निर्देश दिले आहेत.
Manoj Jarange Patil: सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटेन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
मी स्वतः जरांगे यांच्याशी बोलून मार्ग काढू वकिलांची माहिती
ब्रेबॉन स्टेडियम देण्याचं आम्हाला जाहीर करण्यात आलं होत मात्र ते खोट असल्याचं समोर आलं
राज्य सरकारने ने देखील जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात
रस्त्यावरचे दिवे तीन तास बंद करण्यात आले होते
खाद्याची दुकान बंद होती
सार्वजनिक शौचालय बंद होती त्यांच्यासमोर केल्यानंतर शौचालय उघडण्यात आली
ऍड पिंगळे यांची माहिती
आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाची विचारणा
२६ ऑगस्टचा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तुम्ही पालन करणार का उच्च न्यायालयाची वकिलांना विचारणा
तुम्ही प्रसिद्धी पत्रक काढणार का की ५००० वरच्या लोकांनी परत जावं उच्च न्यायालयाची विचारणा
आझाद मैदानाशेजरील दोन्ही मैदाने आंदोलनकर्त्यांना मोकळी करून द्यावी
ब्रेबॉन स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम वर जगा द्यावी आणि त्यांना बाहेर न पडण्याचे निर्देश द्यावेत
आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची मागणी
आंदोलनकर्त्यांचे वकील, ५००० पेक्षा लोक खूप जास्त आहेत
आम्ही सोशल मीडियावर त्यासंदर्भातील मेसेज प्रसारित करू जेणेकरून कोणी रस्त्यावर बाहेर फिरणार नाही
जरांगे म्हणतात आणखीन लाख लोक येतील
आम्ही शांत आहोत कारण योग्य झालं पाहिजे
तुम्ही मुंबई थांबवू शकत नाही रस्ते अडवू शकत नाही मुंबईची दिनचर्या थांबवू शकत नाही आणि हेच सगळ सुरू आहे :उच्च न्यायालय
आंदोलन हाताबाहेर गेल आहे: उच्च न्यायालय
उच्च न्यायालयाच्या निर्देशांच पालन होईल या दृष्टीने राज्य सरकारने पावलं उचलावीत
गुणरत्न्न सदावर्ते
मी २९ तारखेला तक्रार दिली
आझाद मैदानाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना परिस्थिती जाणीव करून दिली
लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला पण पोलिसांनी कारवाई केली नाही
आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू आहे : सदावर्ते
मुंबई उच्च न्यायालयाबाहेर घोषणाबाजी सुरू असल्याचं सदावर्ते यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं
आंदोलनकर्यामध्ये काही समाजकंटक असून ते हा गोंधळ घालत आहेत आंदोलनांच्या समर्थनात असलेल्या वकिलांनी कोर्टात सांगितलं
तुम्ही सगळीकडे आहात मंत्रालयाबाहेर आहात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहे उच्च न्यायालय
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा जरांगे पाटील यांनी उल्लंघन केल्याची राज्य सरकारची माहिती
त्यांनी अटी शर्ती नुसार आंदोलन करण्याचं मान्य केलं होतं
कोर्टाने जरांगे पाटील यांना निर्देश द्यावेत राज्य सरकार
पोलीस देखील कायद्यानुसार पावलं उचलतील राज्य सरकार
उच्च न्यायालयाकडून निर्देशाची मागणी
त्यांचा उद्देश अद्याप स्पष्ट होत नाही: राज्य सरकार
तुम्ही का रस्ते खाली करत नाही अतिरिक्त जमावाला तुम्ही का काढत नाही उच्च न्यायालयाची विचारणा
व्हिडिओत धमकी देण्यात आल्याचं राज्य सरकारने केलं स्पष्ट
मात्र हे अनिश्चित काळासाठी सुरू राहू शकत नाही राज्य सरकारची भूमिका
असच जर सुरू राहील तर कायद्याच राज्य राहणार नाही: राज्य सरकार
मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या वकिलांकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न
मात्र आरक्षण देण्यात आलं आहे उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट
तुम्हाला ते आरक्षण हवं आहे की नाही उच्च न्यायालयाची केली विचारणा
मात्र वकिलाला उत्तर न देता आल्याने कोर्टाने वकिलांना बसण्यास सांगितलं
पूर्ण उच्च न्यायालय घेराव घालण्यात आला आहे उच्च न्यायालय
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या त्यांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आल्याचं न्यायमूर्तींकडून स्वतः सांगण्यात आलं
अजून आंदोलनकर्ते मुंबईत येत आहेत त्यांना कसं अडवणार मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारची विचारणा
आरक्षण राजकारणामुळे हे सगळ सुरू हे
आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप आहे
शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आंदोलनकर्त्यांना ट्रकने सगळ पुरवत आहेत
आंदोलनकर्ते शिवीगाळ करत आहेत
सुप्रिया सुळे यांना घेराव घालण्यात आला त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या मारण्यात आल्या
महिला पत्रकार वार्तांकन करू शकत नाही आहेत
आसपासच्या रुग्णालयात कोणी जाऊ शकत नाहीये
शाहीन बाग आंदोलनानुसार याची चौकशी व्हावी
आगामी निवडणुकांमुळे राज्य सरकार काही करू शकत नाही
सगळ्या मराठा संघटनांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे
ऍड आनंद काटे यांच्या वतीनं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न मात्र उच्च न्यायालयाने घेतला तीव्र आक्षेप
अद्याप तुम्ही हस्तक्षेप याचिका दाखल केली नाही म्हणून तुम्हाला कोणताही हक्क नाही उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट
नियमाला अधीन राहून परवानगी देण्यात आली होती आणि नियमाच्या अधीन राहून आंदोलन करण्याचं मान्य करण्यात आलं होत
हे प्लॅन करून झालं आहे, आंदोलनकर्ते ऐन गणपतीत आले आहेत, राज्य सरकारची कोर्टात खुलासा
आंदोलनकर्त्यांनी नियमांच पालन केलं पाहिजे
उच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत राज्य सरकारची मागणी
मात्र आम्ही आदेश दिले आहेत उच्च न्यायालय
आम्ही वर्तमान पत्रातील बातमीचा आधार घेत आहोत
उच्च न्यायालयाला देखील आंदोलन करत्यांनी वेढल
नियमाला अधीन राहून परवानगी देण्यात आली होती आणि नियमाच्या अधीन राहून आंदोलन करण्याचं मान्य करण्यात आलं होत
हे प्लॅन करून झालं आहे, आंदोलनकर्ते ऐन गणपतीत आले आहेत, राज्य सरकारची कोर्टात खुलासा
नियमांच सर्रास उल्लंघन होत आहे राज्य सरकारची कोर्टात माहिती
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच देखील उल्लंघन झाल्याच राज्य सरकारकडून स्पष्ट
नियमांच सर्रास उल्लंघन होत आहे राज्य सरकारची कोर्टात माहिती
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच देखील उल्लंघन झाल्याच राज्य सरकारकडून स्पष्ट
Manoj Jarange Patil: तुम्ही सगळ्या नियमांच उल्लंघन केल्याच वेळी वेळी राज्य सरकारने जरांगे पाटील यांना सांगितलं.
बैलगाड्या चावल्या जात आहे
शहर एक खेळाच मैदान झालं आहे आहे
राज्य सरकारची माहिती
नियमांच उल्लंघन झाल्याचं राज्य सरकारमधून स्पष्ट
Manoj Jarange Patil: राज्य सरकारने कोणती भूमिका मांडली?
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था सांभाळणं पोलिसांसाठी देखील कठीण आहे
तरी आम्ही समतोल पाळण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बीघणार नाही
शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी
देण्यात आलेली नाही
केवळ पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होत
राज्य सरकारने दिलेल्या परवानगीवर याचिकाकर्त्यांच्या आक्षेप
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा अर्ज वाचण्यास उच्च न्यायालयाकडून सुरू
मात्र अर्जाच्या सुरवातीला आमरण उपोषणाचा उल्लेख
मात्र नियमात आमरण उपोषणाला परवानगी नसल्याने उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
अर्जाच्या खाली जरांगे पाटील यांची सही असल्याचं तुम्ही सांगू शकता का उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
Manoj Jarange Patil: सर्व आंदोलकांनी संयम बाळगावा- मनोज जरांगे
मुख्यमंत्री मनमानी करणारे, त्यामुळे मुंबईत हे घडतंय- मनोज जरांगे
आंदोलक नव्हे, सरकार हुल्लडबाजी करतंय- मनोज जरांगे
Manoj Jarange Patil: एमी फाउंडेशनने ने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाच उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्त्यांकडून कोर्टाला सांगण्यात आलं.
मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचं उल्लंघन केल्याचा याचिकाकर्त्यांचा कोर्टात दावा
आंदोलकांकडून देखील आज उच्च न्यायालयात बाजू मांडली जाणार. कैलास खांडबहाले यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल
मराठा आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असल्याचा गुणरत्न सदावर्ते यांचा कोर्टात दावा
आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीकांत अडाते उच्च न्यायालयात उपस्थित
मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे का मुंबई उच्च न्यायालयाची विचारणा
गेल्या सुनावणीत नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते
याचिकाकर्ते : केवळ आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी आहे याचिकाकर्त्यांचा दावा. मात्र दुसरीकडे आंदोलन करण्यास परवानगी नाही
परवानगी फक्त एका दिवसासाठी देण्यात आली होती: राज्य सरकार
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु-
राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ मुंबई उच्च न्यायालयात दाखल
आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल
एमी फाउंडेशनने ने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते
मात्र त्या आदेशाच उल्लंघन झाल्याच याचिकाकर्त्यांकडून कोर्टाला सांगण्यात आलं
मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाच उल्लंघन केल्याचा याचिकाकर्त्यांचा कोर्टात दावा
आंदोलकांकडून देखील आज उच्च न्यायालयात बाजू मांडली जाणार
कैलास खांडबहाले यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल
Manoj Jarange Patil: राज्य सरकारकडून विविध कायदेशीर विषय आणि पर्यायांवर विचाविनिमय सुरु
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत इतर कायदेशीर पर्यायांचा विचार होत असल्याची माहिती
मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाचा अडसर असल्याने पेच निर्माण
विश्वसनीय सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयाला आज सुट्टी असताना देखील सुनावणी घेण्याच मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्य
एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी
आज आंदोलनाचा चौथा दिवस
९ तारखेला होणार होती सुनावणी मात्र मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्य
अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नसल्याच देखील मुंबई उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत केलं होतं स्पष्ट
मुंबईमध्ये आरक्षणासाठी दाखल झालेल्या मराठा बांधवांना संपूर्ण महाराष्ट्रातून रसद पोचवली जात आहे. त्याच पद्धतीने कोल्हापुरातून देखील मराठा समाजाच्या बांधवांना खाण्याच्या वस्तू पाठवल्या जात आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला मराठा समाजाच्या बांधवांची खाण्याची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली... त्यानंतर मुंबईत न गेलेल्या मराठा समाजाकडून आंदोलकांसाठी खाण्याच्या वस्तू पोहोचवल्या जात आहेत.... कोल्हापुरातून देखील पिण्याच्या पाण्याचे बॉक्स, सफरचंद बिस्किट, लाडू, फरसाण आणि भाकरी पाठवले जात आहेत.... इतकच नाही तर शिजवून खाण्यासाठी तांदूळ आणि पीठ देखील पाठवले जात आहे... आरक्षण मिळेपर्यंत मराठा बांधव मुंबईतच थांबणार आहेत... तोपर्यंत एकाही मराठा बांधवाला खाण्याची वस्तू कमी पडू देणार नाही असा निर्धार करण्यात आला आहे... कोल्हापुरातील मराठा समाजासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी....
सायन - पनवेल हायवे सकाळ पासून जाम
दुपार झाली तरी वाहतूक कोंडी कायम
मानखुर्द येथे मुंबई पोलीसांनी नाकाबंदी केली असल्याने वाहतूक कोंडी
मराठा आंदोलक गाड्या आडवण्यात आल्या आहेत.
फक्त जेवण , जीवनावश्यक गोष्टी असलेल्या मराठा गाड्या सोडल्या जातात. कार्यकर्त्यांना मात्र गाडीतून उतरवून परत नवी मुंबईत पाठवले जात आहे.
दुर्दैवाने मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. आपल्या मागण्या जबरदस्तीने सरकारकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे.
जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आमची विनंती आहे, आंदोलन सुरू झाले तेव्हा शुक्रवार, शनिवार, रविवार असे weekend/सुट्टीचे दिवस आले. मात्र आज सोमवार आहे. मुंबई फक्त राज्याची राजधानी नाही, तर देशाची आर्थिक राजधानी आहे, तिथून देशभराचा उद्योग व्यापार चालवला जातो. 5000 लोकांचे आंदोलनाची परवानगी असताना, मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत पोहोचले आहे. दैनंदिन जीवनासह गणेशोत्सवामध्ये ही व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात बैठक
सोबतच, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बैठकीला उपस्थित
मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालांचा अडसर
अशात, सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत काढण्यासाठी खलबतं
दरम्यान, आज मनोज जरांगेंना सरकारकडून प्रस्ताव जाण्याची शक्यता
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात बैठक
सोबतच, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बैठकीला उपस्थित
मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालांचा अडसर
अशात, सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत काढण्यासाठी खलबतं
दरम्यान, आज मनोज जरांगेंना सरकारकडून प्रस्ताव जाण्याची शक्यता
मराठा आंदोलक मंत्रालयासमोर गाड्या अडवून घोषणाबाजी करत आहे. पोलिसांकडून आंदोलकांना शांतता राहण्याचे आवाहन केले जात आहे.
परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
अर्ध्या तासात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आझाद मैदानात मनोज जरांगेच्या भेटीला येणार आहेत.
आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर CSMT परिसराच्या जवळ असलेल्या शाळा महाविद्यालयांनी आज ऑनलाईन वर्ग सुरू ठेवली आहेत. तर काही महाविद्यालयांनी ऑफलाइन वर्ग सुरू ठेवले आहेत. मोठ्या संख्येने मराठा आंदोलन सीएसएमटी परिसर आणि दक्षिण मुंबई परिसरात दाखल झाली आहे आणि त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळांना आधी असली तरी इतर बोर्डाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी नाहीये. त्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधून शाळा महाविद्यालय सुरू ठेवायचे की नाही या संदर्भातील निर्णय घ्यावा अशा सूचना मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होऊ नये त्यामुळे काही महाविद्यालयाने ऑनलाईन क्लास आज सुरू ठेवले आहेत.
Manoj Jarange Patil: उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी रवाना
मुख्यमंत्री, उपसमिती अध्यक्ष आणि महाधिवक्ता यांच्यात बैठक पार पडणार
जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कायदेशीर मुद्दे उपस्थित होत असल्याने सरकारची खलबतं
Manoj Jarange Patil: राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
विस्ताराने चर्चा झाली
एजी आणि मुख्यमंत्र्यांबरोब झाली
कायदेशीर मुद्दे उपस्थित होतायत
एजी आणि मी मुख्यम्त्र्यांबरोबर बसतोय
आम्ही आमचा अभिप्राय देत प्रस्ताव त्यांना पाठवणार
शासन स्तरावर विलंब यासाठी लागतोय की कोर्टाच्या परीक्षा आम्ही टिकलो पाहिजे
ती मागणी मान्य करायची मग न्यायालयात जात स्थगिती द्यायची हे प्रकार होतात
न्यायालयीन गोष्टी होताना हे सर्व टिकले पाहिजे.
Manoj Jarange Patil: ठाण्यात मराठा आंदोलकांच्या गाड्या अडवल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप
महिला पदाधिकाऱ्यांनी गाड्या सोडण्याची विनंती केली
मुलुंड ठाणे जकात नाक्यावर
आझाद मैदानाकडे आंदोलनासाठी जाऊ देण्याची विनंती
ठाण्यातील आनंदनगर जकात नाका टोल इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मराठा आंदोलनासाठी येणाऱ्या गाड्या आणि वाहतूक कोंडी यासाठी लावण्यात आला बंदोबस्त...
मुंबई पोलीस, वाहतूक विभाग तसेच ठाणे पोलीस, राज्य राखीव दल पोलिसांचा कडे कोड बंदोबस्त...
मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने वाहतूक सुरळीत...
Manoj Jarange Patil: सरकारकडून नुकतीच १७ हजाराची पोलिस भरती जाहीर करण्यात आली. मागच्या वेळेस झालेल्या भरतीत अनेक तरुणहे मेरिटमध्ये येऊनसुद्धा वेटिंगवर आहेत आज जर का आरक्षण असतं तरआज आम्हीही पोलिस भरती झालो असतो. पुढील महिन्यात पोलिस भरतीच्या जागा निघत आहे. आम्ही ही त्यात अर्ज केलाय मात्र त्यापूर्वीच आरक्षणाची घोषणा झाली तर आम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळेच या आरक्षणाच्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो असलो तर भरतीचा अभ्यासही महत्वाचा असल्याने या ठिकाणी चिखलात अभ्यासाला बसलो असल्याची प्रतिक्रिया या तरुणांनी दिली.
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली
काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठकांचे सत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात बैठक
सकाळी ११ वाजता वर्षा निवासस्थानी खलबतं
मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालांचा अडसर
अशात, सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत काढण्यासाठी खलबतं
दरम्यान, आज मनोज जरांगेंना सरकारकडून प्रस्ताव जाण्याची शक्यता अधिक
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलकांनी सीएसटीकडून फाउंटनकडे जणारा रस्ता रोखून धरला आहे.
Manoj Jarange Patil: बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावातून मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी पाच क्विंटल बुंदी आणि पाच हजार भाकऱ्यांची शिदोरी पाठवली जातेय. मुंबईत अन्न पाण्याविना मराठा आंदोलकांची गैरसोय झाली. हीच बाब लक्षात घेता अनेकांनी पुढाकार घेत मुंबईच्या दिशेने हजारोंच्या संख्येने ठेचा आणि भाकरी पाठविल्या.. यात भाकऱ्यांच्या शिदोरीसह लिंबागणेश गावातून गोड पदार्थ म्हणून पाच क्विंटल बुंदी देखील पाठवण्यात येतेय. ही शिदोरी मुंबईकडे पाठविण्यासाठी मागील दोन दिवसांपासून ग्रामस्थांची तयारी सुरू होती. पाचशे भाकरी, दोन क्विंटल चिवडा, पाच क्विंटल बुंदी 500 पाणी बॉक्स यासह इतर साहित्य मुंबईला रवाना केले जात आहे. विशेष म्हणजे काही धनगर बांधवांनी शिदोरी सोबत वाहनांसाठी इंधनाची सोय केली. तर मुस्लिम बांधवांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आज वर्किंग डे असल्यामुळे प्रत्येक नोकरदार मुंबईकर हा आपल्या ऑफिसपर्यंत पोहोचत आहे मात्र ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने प्रत्येक नोकरदार मुंबईकराची तपासणी करून आणि त्यांच्या बॅगमध्ये असलेले साहित्य तपासूनच त्यांना आत मध्ये प्रवेश दिला जातो आहे. आय कार्ड नसलेल्यांना पोलिसांकडून प्रवेश नाकारण्यात येतोय.
Manoj Jarange Patil: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
सांताक्रुझ वाकोला उड्डाणपूलावर खड्ड्यात मोठा पॅच मारल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
बोरिवली कडून वांद्रे च्या दिशेने जाणारा मार्गावर वाकोला,विलेपार्ले,अंधेरी दरम्यान ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
आठवड्याचा पहिला दिवस आहे मोठा संख्या मध्ये चाकरमानी कामासाठी निघाले आहे मात्र या वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
दुसरी बाजू वाहतूक कोंडी काढण्याच्या प्रयत्न देखील वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरु आहे...
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनकडून मंत्रालय परिसरात सरकारी प्रताप जोरदार घोषणाबाजी...
मंत्रालयासमोर भाकर चटणी ठेवून सरकारला नैवेद्य दाखवत सरकारचा निषेध करण्याचा प्रयत्न
दोन दिवसांपासून मुंबईतील मराठा आंदोलकांना पाणी मिळू नये यासाठी सरकारने गनिमी कावा केलाचा आरोप
आम्ही आमच्या गावाकडून आणलेली चटणी भाकरी सरकारला देत आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत आंदोलकांची प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली
काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठकांचे सत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात बैठक
सकाळी ११ वाजता वर्षा निवासस्थानी खलबतं
मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालांचा अडसर
अशात, सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत काढण्यासाठी खलबतं
दरम्यान, आज मनोज जरांगेंना सरकारकडून प्रस्ताव जाण्याची शक्यता अधिक
Manoj Jarange Patil: सायन - पनवेल हायवेवर वाशी टोल नाका येथे वाहतूक कोंडी
वाशी ते मानखुर्द पर्यंत वाहतूक कोंडी
सोमवारचा दिवस आणि मराठा आंदोलन यामुळे वाहतूक कोंडीत भर
पोलीसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न
Manoj Jarange Patil: पूर्व मुक्त मार्ग जिथे संपतो त्या वाडी बंदर इथे वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात
पी डिमेलो रोड सुरू होतो त्या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी
त्यामुळे थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी नंतर वाढू शकते
केवळ अन्य धान्य घेऊन जाणाऱ्या वाहनांना आझाद मैदान कडे सोडले जात आहे,
बाकीच्या वाहनांना वाडी बंदर पार्किंग मध्ये सोडण्यात येऊन आंदोलकांना ट्रेन किंवा पायी आझाद मैदानाकडे पाठवले जात आहे.
Manoj Jarange Patil: मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करावा या मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीवर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती सरकारने तातडीने नेमावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी केलीय. या समितीमध्ये उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनाही घेऊन सात दिवसांमध्ये या समितीकडून अहवाल मागवावा. जर शरद पवार यांच्या या समितीने मराठ्यांना ओबीसी मध्ये सामील करा असा अहवाल दिला तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये सामील करावं किंवा मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या अशी समिती म्हंटली तर सरकारने वेगळे आरक्षण द्यावे. पण सरकारने तातडीने अशा पद्धतीची समिती गठीत करावी आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील या विषयाला सकारात्मक असा प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन मागे घेण्याची आवश्यकता आहे असं आवाहन संदीप गिड्डे पाटील यांनी केलं आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण करत आहे त्या अनुषंगाने राज्यभरातून हजारो मराठा बांधव हे मुंबईत दाखल झालेले आहेत. सरकारसोबत आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप देखील कोणताही मार्ग निघाला नाही त्यामुळे आंदोलनांचा टप्पा हा तीव्र होताना दिसून येतोय या अनुषंगाने खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहेत तर ठिकठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय.
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण करत आहे त्या अनुषंगाने राज्यभरातून हजारो मराठा बांधव हे मुंबईत दाखल झालेले आहेत. सरकारसोबत आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप देखील कोणताही मार्ग निघाला नाही त्यामुळे आंदोलनांचा टप्पा हा तीव्र होताना दिसून येतोय या अनुषंगाने खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहेत तर ठिकठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय.
Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या आंदोलनाला काही टवाळखोर मुलांमुळे गालबोट?
माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दादाजीस्ट्रीट फोर्ट परिसरात आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांकडून कपडयाच्या दुकानात चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे
स्क्रू ड्राईव्हरच्या सहाय्याने कपड्याच्या दुकानाचे ताळे तोडून दुकानातील काही कपडे आणि सहा हजाराची रोकड चोरल्याची तक्रारदाराची पोलिसांना माहिती
चोरीचा हा प्रकार दुकानातील CCTV मध्ये कैद झाला असून पोलिस आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेत असल्याची सूत्रांची माहिती
या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत
मात्र आंदोलनाच्या नावाखाली मुंबईत आलेल्या मराठा बांधवांच्या आडून जर का अशा चोरीच्या या घटनेमुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला गालबोट लागत असल्याचे दिसून येते
यातील तक्रारदार यांनी दुकानातील चोरीची माहिती एक्सवर पोस्ट करत, मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्त यांच्या अकाऊंटला टॅग करत ही माहिती दिली
Manoj Jarange Patil: पूर्व मुक्त मार्गावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे, सध्या तरी या मार्गावर वाहतूक कोंडी नाही, खासगी वाहने आणि मराठा आंदोलकांची वाहने देखील यावरून जाऊ दिली जात आहेत, मात्र ९ नंतर ऑफिस वेळा सुरू झाल्यावर परिस्थिती बदलू शकते असा अंदाज आहे,
Manoj Jarange Patil: मुंबईत दाखल झालेल्या हजारो मराठा बांधवांसाठी सकाळपासून अन्नछत्रांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले मराठा बांधव हे पुन्हा आझाद मैदानाकडे जात आहे विविध ठिकाणी या मराठा बांधवांसाठी फळवाटप तसेच उपमा पोहे आणि चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या चाफेकर बंधू चौकाच्या परिसरात ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे.
Manoj Jarange Patil: सीएसएमटी स्थानकावर पोलिसांच्या बॅरिकेटवर बसून मराठा आंदोलकांचा खेळ सुरू आहे.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस, आजपासून पाणीही न पिता कडक उपोषण करण्याचा जरांगेंचा निर्धार....तर मुंबई ठिकठिकाणी मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी
Manoj Jarange Patil: नवी मुंबई - सिडको येथे मराठा आंदोलकांना महाराष्ट्रमधून मोठ्या संख्येने मदत येण्यास सुरुवात
भाकरी , चपात्यांचे लागले ढीग
प्रत्येक जिल्ह्यातून मदत येणे सुरवात
तांदूळ , गहू , पाणी , बिस्किट आ दी साहित्य येण्यास सुरवात
Manoj Jarange Patil: मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्व सुरू असलेल्या मराठा आंदोलकांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. धाराशिवच्या कळंब मधील मोहा गावातील स्वराज गणेश मंडळाने डीजे मुक्त मिरवणूक काढायचा संकल्प करत मदत मुंबईकडे रवाना केली. गावातील अठरापगड जातीतील लोकांनी मदतीचा हात दिला. राज्यभर अनेक गावातून भाकरी आणि भाजी बनवून मुंबईकडे रवाना होत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या भाकरी खराब होऊ शकतात म्हणून मुंबईतच जेवण बनवून देण्याचा निर्णय करत मोहा येथील तरुण मुंबईकडे रवाना झाले.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधव सहभागी झाले आहेत मात्र त्यांच्या खाण्या पिण्याची सोय होत नसल्याने परभणीतील सकल मराठा बांधवांकडुन तब्बल ३० ते ४० हजार लोकांना पुरेल एवढा अन्न धान्य पाठवले गेले आहे.ज्वारी,बाजरी,नाचणीची भाकरी,पोळ्या चटण्या,वेगवेगळे लोणचे,भाज्या,कांदे,बिस्किट पाणी आदि साहित्य एकत्र करत व्यवस्थित पॅकिंग करून आयशरच्या माध्यमातून मुंबईत पाठवले गेले आहे आज हा पहिला लॉट पाठवण्यात आला आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तिथे सर्व आंदोलक असणार आहेत तोपर्यंत इथून सर्व शिधा हा मराठा बांधवांपर्यंत पाठवला जाणार आहे.
Manoj Jarange Patil: आझाद मैदानावर मराठा बांधवांसाठी खाण्याचे साहित्य पाणी
फरसाण बिस्किट चंदनाचे लाडू चिवडा
तांदूळ लोणचे कांदे जीवनावश्यक वस्तू
राज्यभरातून आझाद मैदानामध्ये ट्रक दाखल झाला आहे.
मराठा बांधवांची गैरसोयी होऊ नये, यासाठी सामाजिक संस्था आणि मराठा बांधवांनी मुंबईच्या दिशेने सामान पाठवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा साम्राज्य निर्माण झालं आहे. एकीकडे आंदोलक याठिकाणी मुक्कामाला आहेत तर दुसरीकडे कामावर जाणारे प्रवासी देखील मोठ्या संख्येने याठिकाणी येतात त्यामुळे हा कचरा तत्काळ साफ होण गरजेचे आहे. जी प्लेटफॉर्म वर स्थिती आहे तीच रेल्वे ट्रॅकवर आहे. फळांच्या साली, पाण्याच्या बॉटल, जेवणाच्या पत्रावल्यांचा खच मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
Manoj Jarange Patil: जालन्याहून शिदोरी घेऊन मराठा आंदोलक पोहचत आहे. पुरी भाजी लोणंच, ठेचा घेऊन आझाद मैदानाच्या दिशेने जात आहे
Manoj Jarange Patil: जे जे ब्रिज उतरल्यानंतर एमआरएफ पोलीस स्टेशनच्या समोरून वाहतूक वळवण्यात आली आहे... सीएसएमटी स्टेशन कडे मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाणारी वाहतूक ही अलीकडूनच वळवण्यात आली आहे. हा रस्ता पोलीस आयुक्तालय वरून पुढे मंत्रालय गिरगाव चौपाटी नरिमन पॉईंट कडे जाईल... जे जे ब्रिज वरून पुढे सीएसएमटीकडे जाणारा रस्ता बॅरिगेटिंग करून बंद करण्यात आला आहे... लोकांना सांगितलं जातंय की तुम्ही वळवलेल्या ट्रॅफिक नुसार मार्गस्थ व्हावं...
Manoj Jarange Patil: आज सकाळपासून उपनगरातून आंदोलक पुन्हा एकदा सीएसएमटी स्थानकात एकत्र यायला सुरुवात झाली आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस आहे तर आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आंदोलक ढोल ताशाच्या तालावर सकाळपासूनच नाचताना पाहायला मिळत आहेत. तसेच जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवताना दिसत आहेत.
Manoj Jarange Patil: सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जे.जे. फ्लाय ओव्हरवर नाकाबंदी करण्यात आली आहे.आंदोलकांच्या गाड्या या जेजे ब्रिज वरून न सोडता खालून कर्नाक ब्रिज मार्गे वाडी बंदरला सोडण्यात येत आहेत... शिवाय जे जे ब्रिज उतरल्यानंतर एम आर एफ पोलीस स्टेशन इथून मार्ग वळवण्यात आला आहे... सीएसएमटी मुंबई महापालिका समोरील मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil: आजपासून मनोज जरांगे पाटील हे पाणी त्याग ही करणार आहेत ...
त्यात कालच डॉक्टर यांनी त्यांना पाणी जास्त पिण्यास सांगितले आहे ,ors घेण्यास सांगितले आहे ...
सध्या जरांगे यांची शुगर ही फक्त 70 च्या आसपास आहे ...
त्यामुळे पाणी ही त्याग केलास त्यांची प्रकृती खालावू शकते असे डॉक्टर टीम कडून सांगण्यात येत आहे ...
Manoj Jarange Patil: जालन्यातील अंतरवाली सराटीत आजपासून ओबीसी समाजाचं उपोषण... तर नागपूरच्या संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध
Manoj Jarange Patil: मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवाची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज बंद राहणार आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक ही देण्यात आली आहे. वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशी 70 जणांची वाढीव कुमक या दोन वाहतूक पोलिस चौक्यांना देणयात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर (Maratha Reservation Protest Azad Maidan) उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजपासून (1 सप्टेंबर) पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- मुंबई
- Manoj Jarange Patil Mumbai Morcha Azad Maidan Live Updates: मुंबईतील CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा - हायकोर्ट